Kolhapur News : गेल्या वर्षी उसाचा हंगाम उशिराने सुरू झाल्याने कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांचा सुमारे तीस लाख टन ऊस पळवून नेला. याचा फटका सीमाभागातील महाराष्ट्रातील कारखान्यांना बसला. गाळप कमी झाल्याने कारखान्यांचे अर्थकारण बिघडले. .या पार्श्वभूमीवर विशेष करून सीमाभागातील कारखान्यांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक बरोबरच राज्यातील हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्तालयांचील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत..Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीस गती.गेल्या वर्षी राज्यात १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू झाला. राज्यातील अनेक साखर कारखानदार निवडणूक प्रक्रियेत असल्याने ऊस गाळपास नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वेग आला. कर्नाटकचे कारखाने मात्र २५ ऑक्टोबरला सुरू झाल्याने सीमाभागातील महाराष्ट्राच्या हद्दीतला ऊस कर्नाटकच्या अनेक कारखानान्यांनी गाळप केला. .कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील ऊसही कर्नाटकातील कारखान्यांनी तोडला याचा फटका या भागातील कारखान्यांना बसला. यंदा ती परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी कर्नाटक बरोबर हंगाम सुरू करण्याबाबत कारखान्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अद्याप या बाबत कारखानदारांच्या संघटनांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी काही कारखानदारांनी एकत्र येऊन आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे..गेल्या वर्षीचा साखर हंगाम मंदीचा ठरला. एकीकडे उसाचे उत्पादन घटले. महाराष्ट्रातील साखर उत्पादन २०२३-२४ च्या हंगामाच्या तुलनेत सुमारे २६.६ टक्क्यांनी कमी झाले. या हंगामात ११० लाख टन उत्पादन झाले होते, २०२४-२५ मध्ये ते ८०.७६ लाख टनांपर्यंत घसरले. हंगामात २०० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते..Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस.परंतु उसाची कमी उपलब्धता आणि कमी उतारा यामुळे अनेक कारखान्यांनी लवकर गाळप बंद केले. हंगामात साखरेचा सरासरी उतारा ९.४६ टक्के इतका राहिला, जो २०२३-२४ च्या १०.२ टक्के उताऱ्यापेक्षा कमी होता.उसाची कमी उपलब्धता आणि दुष्काळी परिस्थितीमुळे या हंगामाचा कालावधी खूपच कमी होता. अनेक कारखान्यांनी ९० दिवसांपेक्षाही कमी वेळ गाळप केले. कमी गाळप आणि कमी उताऱ्यामुळे साखर उद्योगाला १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा आर्थिक फटका बसला..कारखाने धास्तावलेसीमा भागातील अनेक साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. गेल्या वर्षी क्षमतेइतके उसाचे गाळप न झाल्याने व्यवस्थापन खर्चात वाढ झाली. याचा जबर फटका या कारखान्यांना बसला. उसाच्या उत्पादनात घटीबरोबरच कर्नाटककडे गेलेला ऊस हेही महत्त्वाचे कारण ठरले. यामुळे धास्तावलेल्या कारखान्यांनी कर्नाटक बरोबर गाळपाची मागणी लावून धरली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.