Weather Impact: मागील चार दिवसांपासून सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस, सोबतच वादळी वारे आणि गारपिटीमुळे राज्यभरात विविध ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अहिल्यानगर, अकोला, बुलडाणा, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. .पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले, राहुरी, पाथर्डी, पारनेर आणि नगर तालुक्यांत गारपिटीसह पाऊस झाला. जिल्ह्यातील ४१ गावांतील सुमारे ७ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?.गहू, हरभरा, मका, कांदा, तसेच आंबा पिकांना मोठा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके, फळपिकांचे, तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६५ गावांतील सुमारे ३६१६ शेतकऱ्यांचे एकूण १४९०.७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे..सांगलीत द्राक्षांना तडाखासांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. ज्वारी, गहू, भुईमूग आणि भाजीपाला पिके बाधित झाली असून निर्यातक्षम द्राक्ष बागांवर परिणाम झाला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, माण आणि खटाव तालुक्यांत गारपिटीसह पाऊस झाला. काढलेला गहू भिजल्याने नुकसान झाले असून ज्वारी भुईसपाट झाली आहे. आंबा फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे..Unseasonal Rain: पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा घाटनांद्रा परिसराला तडाखा.ज्वारी, गहू, हरभऱ्याचे नुकसानसोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर भागात गारपिटीने द्राक्षबागांचे मोठे नुकसान केले. ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा पिकांनाही फटका बसला असून काही ठिकाणी बागा कोसळल्याच्या घटना घडल्या..मराठवाड्यात दैनामराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पूर्वमोसमी पावसाचा परिणाम दिसून आला. काढणीस आलेला, तसेच काढून ठेवलेला गहू, हरभरा भिजल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. अर्धापूर तालुक्यात टरबूज, केळी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्टर शेतजमिनीला फटका बसला असून हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे..Unseasonal Rine: माण, फलटण तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा.अकोला, बुलडाण्यात गारपीटपश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये चिखली, लोणार आणि अकोट भागात गारपीट झाली. काढणीस आलेला गहू आडवा पडला असून मका, आंबा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रब्बी हंगामाच्या अखेरीस झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पादन धोक्यात आले आहे. बाजारात चांगले दर असतानाही नुकसान झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हवामानातील अनिश्चितता कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे..सत्वर पंचनाम्यांची मागणीहातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे भुईसपाट झाल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे बाधित क्षेत्राचे सत्वर पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी त्वरित पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणच्या संबंधित सरकारी यंत्रणांना दिले आहे..जिल्हानिहाय स्थितीअहिल्यानगर : ४१ गावे, ७,३५२ शेतकरी, ३५०० हेक्टरचे नुकसानअकोला - बुलडाणा : गारपीट; गहू, मका, भाजीपाला बाधितसांगली : द्राक्ष बागांना फटकासातारा : गहू भिजला, ज्वारी भुईसपाट, आंबा फळगळसोलापूर : द्राक्षबागांचे नुकसानपरभणी-हिंगोली-नांदेड : काढलेला माल भिजला,दर्जा खालावलासर्वाधिक बाधित पिके : गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, द्राक्ष, डाळींब, आंबा, भाजीपाला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.