Mumbai News: गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, तसेच राज्य सरकारने गुन्ह्यांना प्रतिबंध, शोध, गुन्हा दाखल करणे आणि तपास करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश असताना महाराष्ट्र पोलिसांनी गुळमुळीत परिपत्रक काढून कथित गोरक्षकांना रान मोकळे करून दिले आहे. .कायदा व सुरक्षा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी याबाबत परिपत्रक काढले असून यामध्ये गुरांची बेकायदा वाहतूक करण्याची माहिती मिळाल्यानंतर केवळ पोलिसांनी व संबंधित अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी..Livestock Market : मालेगाव बाजार समितीतून ९७ गोवंश जनावरे जप्त.खासगी व्यक्तींनी कुठल्याही पद्धतीने गाडी अडवून तपासणी करणे, मारहाण करणे हे कायद्याला अनुसरून नाही. जनावरांच्या बेकायदा वाहतुकीबाबत कुठल्याही नागरिकाने तक्रार केल्यास पोलिसांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. पकडलेली जनावरे परत देण्याबाबत खात्री करून नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश काढले आहेत..वास्तविक सध्या राज्यभरात कथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून कुरेशी समाजाने जनावरे खरेदी-बंदीचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत प्रश्न उपस्थित झाला असता ४ आणि २३ जुलै रोजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशात गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या समाजविघातक घटकांविरुद्ध राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, असे म्हटले आहे..Desi Cow Research: देशी गाय संशोधन, प्रशिक्षण केंद्रातून दिशादर्शक काम : तुषार पवार.पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्यांचे विषय आहेत. राज्य सरकारे गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध, नोंदणी आणि तपास करण्यासाठी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांद्वारे गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी जबाबदार आहेत, तरीही गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कायद्यानुसार त्वरित शिक्षा व्हावी यासाठी आदेश जारी केले आहेत..त्यानुसार कथित गोरक्षकांवर कारवाई व्हावी, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. विशेष पोलिस महनिरीक्षक डॉ. शर्मा यांनी कथित गोरक्षकांना सूट देणारे परिपत्रक काढले आहे. शर्मा यांनी सर्व लोहमार्ग पोलिस आयुक्त, अपर पोलिस महासंचालक आणि लोहमाग पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे..मुळात गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. देशी गाय हत्याबंदी कायदा होण्याची गरज आहे. संकरित भाकड गाय, बैल, वासरे संगोपन करणे कुठल्याही शेतकऱ्याच्या आवाक्यात नाही. त्यात गोरक्षकांचा धुमाकूळ सुरू आहे. यातून मोठी लूट होत आहे. त्यामुळे कायद्यातच सुधारणा करण्याची गरज आहे.राजू शेट्टी, माजी खासदार.कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यात चांगल्या हेतूच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांना संरक्षण देण्यात आले आहे. मग हे परिपत्रक जनतेची धूळफेक करणारे नाही का?सचिन सावंत, काँग्रेस नेते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.