Kolhapur News : राज्यातील शेतकऱ्यांना २०१७ व १९ या वर्षी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतून कर्जमाफी करण्यात आली होती. .तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कशा पद्धतीने कर्जमाफी करावी, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. .Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही.या समितीचा अहवाल आल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची भूमिका राज्य सरकारची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २५) दिली..श्री. पवार सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, कागल ते पुणे महामार्गाची टोल वसुली थांबवा, एकरकमी एफआरपी द्या आदी मागण्यांचे निवेदन श्री. पवार यांना दिले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली..Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन.श्री. पवार म्हणाले, की सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीच करू देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनीच याबाबत विरोधाची भूमिका घेतली असल्याने मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील..या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, राजाराम देसाई, डॉ. बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, विक्रम पाटील, भिकाजी चव्हाण, विशाल चौगुले, बंडू पाटील, बंडू चौगुले, बाजीराव देवाळकर, पिंटू शिरणे, पंकज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.