Farmer Debt Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांची सावकारांकडून लूट होत असल्याचा प्रश्न सोमवारी (दि. २९ जून) विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर त्यावर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोठा खुलासा केला. राज्यात सध्या १२ हजार २११ परवानाधारक सावकार आहेत. सावकारांनी दिलेल्या कर्जात २०२२ पासून आतापर्यंत ४०० कोटींची वाढ झाली आहे. तर बँकांनी शेतकऱ्यांना २०२२ पासून आतापर्यंत ५ वर्षांमध्ये १२ हजार ४१५ कोटी कर्ज दिले आहे, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी दिली. .याबाबत अमरावतीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांनी मुद्दा उपस्थित केला. अमरावतीमध्ये अवैध सावकारीची किती प्रकरणांची नोंद झाली आणि किती गुन्हे दाखल केले? असा प्रश्न त्यांनी विचारला. शेतकऱ्यांना किडनी विकावी लागतंय हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी पुढच्या काळात सावकारांकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही. यावर सरकारची भूमिका काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला. .या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यात ५७४ नोंदणीकृत परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी २०२६ मध्ये ४३,९३६ कर्जदारांना ५४ लाख रुपये तारण आणि बिगर तारण कर्ज वाटप केले. राज्यात डिसेंबर २०२५ अखेर १२ हजार २११ परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी ५,५४,९५० कर्जदारांना १२८७.९३ कोटी रुपये शेती आणि बिगर शेतीविषयक कर्जवाटप केले..Illegal Moneylender: सावकाराने बेकायदा जप्त केलेली अवजारे केली शेतकऱ्यांना परत; सहकार विभागाची कारवाई.सावकारी कर्जावर व्याज किती?यापूर्वी सावकार घरी बसूनच सावकारी करायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये तक्रारी आल्यानंतर सावकारांना कडक सूचना दिल्या आहेत. ज्या लोकांना परवाने दिले आहेत, त्यांनी परवानाधारक असल्याचा फलक त्याचे कार्यालय, घरासमोर लावावा. सावकारी नियमन २०१४ मधील २९, ३१, ३२ नुसार सावकाराने आकारायचे व्याजदर ठरवून दिलेले आहेत. शेतकऱ्याला तारण कर्ज द्यायचे असेल तर प्रति वर्षी ९ टक्के, बिगर तारण कर्जावर १२ टक्के व्याजदर आहे. शेतीव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज द्यायचे असेल तर तारण कर्जासाठी प्रति वर्ष १५ टक्के प्रमाणे व्याज द्यायचे आहे. बिगर तारण कर्जाचा व्याजदर १८ टक्के असल्याची माहिती सहकारमंत्री पाटील यांनी दिली. .Moneylender Loan: सावकारी कर्जाचा विळखा.यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे प्रमुख आहेत. पोलीस अधीक्षक, निबंधक त्याचे सदस्य आहेत. त्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणे कामकाज झाले आहे की नाही हे तपासण्याचे काम जिल्हाधिकारी करतात. .अमरावतीमध्ये अवैध सावकारीची ३४ प्रकरणे कलम २६ आणि १७ अंतर्गत अमरावतीमध्ये ३८३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील २६६ प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलेले नाही. पंरतु अवैध सावकारीची ३४ प्रकरणे आढळून आली असून, संबंधितांवर एफआयआर करण्यात आलेले आहेत. ४८ व्यक्ती आरोपी आहेत. अमरावतीमध्ये पात्र परवानाधारक सावकारांची संख्या २०२१-२२ मध्ये ९८१ आहे. राज्यामध्ये १,२४९ होती. त्या तुलनेत आतापर्यंत १२,२११ परवानाधारक आहेत. आमचे अधिक लक्ष शेतकऱ्यांकडे आहे. शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्याला न्याय दिलेला आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. .सावकारी जिवंत असल्याचे सरकारने मान्य केले- वडेट्टीवारसावकारी कर्जामध्ये ४०० कोटी रुपयांची वाढ झाली. याचाच अर्थ अवैध सावकारी जिवंत असून, त्यात वाढ होत आहे हे सरकारने मान्य केले. यावर कायमस्वरुपी उपाय का निघत नाही? असा प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला. .सावकार चिठ्ठीवर कर्ज देतातबिनापरवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतली. यावर आपण कारवाई करु शकत नाही. कारण ते चिठ्ठीवर कर्ज देतात. कोणताही लेखाजोखा ठेवत नाहीत. अव्वासव्वा व्याज घेतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करावा. अवैध सावकारांची तक्रार आल्यानंतर कारवाई करणार का? असा प्रश्न मुर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.