Mumbai News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निकष फार किचकट असणार नाहीत. हे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. समिती या संदर्भात काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ११) विधानसभेत सांगितले. तसेच महाराष्ट्राची ८१ लाख हेक्टर सिंचन क्षमतेपैकी ५७ लाख हेक्टर, म्हणजेच ७० टक्के सिंचन क्षमता निर्माण केल्याचा दावाही त्यांनी केला..अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असून अडचणी असल्या तरी आर्थिक शिस्त पाळल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तसेच पुढील काही वर्षांत यूएई आणि सिंगापूरलाही ती मागे टाकेल. महाराष्ट्र लोकसंख्या निहाय देशात दुसरे राज्य असूनही सकल उत्पन्नामध्ये वरच्या क्रमांकावर आहे. आपण कर्जाची चिंता करत असतो, तरीही काढलेले कर्ज कुठे खर्च होते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. राज्याची महसुली तूट एक टक्क्यांच्या आत राखण्यात सरकारला यश मिळाले आहे..Farm Loan Waiver: सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा.शेत पाणंद रस्ते योजनेसाठी निधी नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नाही. या योजनेसाठी १००० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. यंत्राद्वारे रस्ते करण्यात येतील. तसेच जुनी पाणंद रस्ते योजनाही सुरूच राहील, असेही ते म्हणाले..सिंचन क्षमतेत वाढराज्याचा जलआराखडा तयार केला असून त्यात अंतिम सिंचन क्षमता ८१ लाख हेक्टर आहे. नदीजोड प्रकल्प सुरू होण्यापूर्वी तयार केलेला हा आराखडा असून त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र जून २०२४ आणि अलीकडील बांधकामाधीन प्रकल्प पाहता राज्यात ५७ लाख हेक्टर, म्हणजेच ७० टक्के सिंचन क्षमता तयार केली आहे. मराठवाड्याची १७ लाख हेक्टर सिंचन क्षमता असून त्यापैकी १२ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार झाली आहे..Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक.दोन लाख ४३ हजार हेक्टर सिंचन क्षमतेची कामे सध्या सुरू आहेत. राज्यातील ११० लघू आणि ६७ मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय नदीजोड प्रकल्प वेगाने पुढे जात असून उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पाद्वारे ७८ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेण्यात येईल. हा ८७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून चार महिन्यांत सर्व मान्यता देण्यात येतील..३३ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजमागेल त्याला सौर पंप योजनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. प्रतिदिन १५०० पंप देण्यात येत आहेत. या योजनेमुळे ४० लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्यात यश मिळाले असून १० लाख २५ हजार शेतकरी या योजनेचे लाभार्थी झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. राज्यातील ४६ लाख कृषी ग्राहकांपैकी ३३ लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करण्यात आला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवसा वीज देण्यात येईल. या योजनेमुळे वीज खरेदीवर होणाऱ्या सुमारे १० हजार कोटी रुपयांचा खर्च आणि सरकारच्या सबसिडीतील ५५०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच २५ टक्के कार्बन उत्सर्जनही कमी झाले आहे, असे ते म्हणाले..Farm Loan Waiver: नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान दीड लाख रुपये करा.शेती संदर्भातील मुद्द्यांना बगलअर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बहुतांश सदस्यांनी कर्जमाफी आणि शेती क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींवर भाष्य केले होते. महायुतीने जाहीरनाम्यात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात दोन लाखांच्या कर्ज मर्यादेत कर्जमाफी जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यावर टीका केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करणे टाळले. अखेर भाषण संपल्यानंतर ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी कर्जमाफीच्या निकषांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणींबाबतही त्यांनी नुकतेच सविस्तर भाष्य केले होते, या बाबत स्पष्टता द्यावी, असे ते म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे निकष जाहीर करण्यात येतील. तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणी संदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे सांगितले..जलजीवनसाठी निधी मिळेलजलजीवन मिशन अडचणीत आहे हे खरे आहे. मात्र केंद्र सरकारने ८.६९ लाख कोटी रुपये कालच मंजूर केले आहेत. राज्यातील १५ हजार कोटी रुपयांची जलजीवन मिशनची देणी आहेत. मात्र यंदा १२ हजार ८०० कोटी रुपये लवकरच मिळतील, असे उत्तरादरम्यान ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.