Vanchit Bahujan Aaghadi Protest: दिल्लीतील विद्यार्थ्याच्या आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आज (दि. २३ जुलै) वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. त्याला काही ठिकाणी उत्स्फुर्त तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे, वसई- विरार, कोल्हापूर, बुलढाणा, नाशिकमध्ये 'वंचित'चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. .पुण्यात भिडे वाड्यापासून सुरु झालेला 'वंचित'चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. अकोला, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले (कोल्हापूर), बीड वडवणी, दिंडोरी (दि. नाशिक), नागपूर येथेही दुकानदारांनी दुकाने बंद करुन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे..महाराष्ट्र बंददरम्यान मुंबईत पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या सुमारे ३ हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. त्यांना धमकावले जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. पेपरफुटी प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. .Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार.'माकप'चे राज्यभर आंदोलनदिल्लीतील जंतर- मंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि मित्र पक्षांच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. .Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम.ठाकरे शिवसेना, मनसेचा २६ जुलैला मुंबईत संयुक्त मोर्चाविद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली..हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सहभागी होतील. पण त्यांच्या पालकांनीदेखील सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले जाते आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले.भाजपने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलेही आंदोलन झाले तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे, अशी टीका त्यांनी केली..मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींना इशाराराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जर तुमच्यात हिंमत आहे आणि तुम्हाला खरंच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार असेल तर संसदेत चर्चा करा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे. जर लोकशाही मानत असाल तर संविधानावर विश्वास आहे तर चर्चा आणि निर्णयासाठी महत्त्वाचे ठिकाण संसद आहे. पण तुम्ही चर्चेपासून तुम्ही दूर पळून का जात आहात? असा सवाल त्यांनी केला. .तुमच्या सरकारच्या काळात कर्नाटक, तेलंगणात पेपरफुटी झाली. राजस्थानमध्ये जेव्हा तुमचे सरकार होते तेव्हा आठवेळा पेपरफुटी झाली. आमच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणे थांबवा, असा इशारा फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.