Satara News : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून नोंदणी करून लॉटरी पद्धतीने सोडत काढून शेतकऱ्यांची निवड केली जात होती. आता यामध्ये बदल करून गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने लॉटरीऐवजी प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्राधान्य देण्याची कार्यप्रणाली अवलंबली आहे. .प्रक्रियेत सहभागी होताना चुकीची व खोटी कागदपत्र देऊन दिशाभूल करणाऱ्या लाभार्थींना पुढील पाच वर्षांसाठी ब्लॉक केले जाणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २०१९ पासून सुरू केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या योजनांचा समावेश आहे..Agriculture Scheme: वैयक्तिक लाभाच्या योजना आता ऑनलाइन.महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात लॉटरीद्वारे निवड केली जात होती. यामध्ये काही बदल व सुधारणा करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी शेतकऱ्यांची सूचना व तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन यामध्ये कृषी विभागाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे..महाडीबीटी प्रणालीत लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी व लाभ देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी आता लॉटरीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याची कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण प्रवर्गात लक्षांक वाटप हे तालुकास्तरावर व अनुसूचित जाती, जमाती, तसेच अपंग प्रवर्गासाठी हा लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा असणार आहे,.तसेच कृषीच्या योजनेसाठी अर्ज पात्र ठरल्यानंतर दिलेल्या मुदतीत त्याचा लाभ घ्यावा लागणार आहे. अन्यथा हा अर्ज रद्द करण्यात येणार आहे, त्याबाबतचा संदेशही शेतकऱ्याला पाठविला जाणार आहे. या बदललेल्या नियमावलीमुळे आता प्रलंबित यादीतील शेतकऱ्यांनाही कृषीच्या योजनांचा लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे..Agriculture Scheme Evalution: मोल मूल्यमापनाचे!....अशी असणार प्रक्रियाया कार्यप्रणालीत एक एप्रिल २०२५ पासूनचे अर्ज विचारात घेतले जातील. त्याद्वारे महाडीबीटी पोर्टलवर आजअखेर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, ते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे विचारात घेतले जाणार. परिणामी हे अर्ज लवकरच निकाली निघतील. लाभार्थी नोंदणी करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांकडून लाभ वसूल केला जाणार आहे..संबंधित शेतकऱ्यांचा आधार व फार्मर आयडी पुढील पाच वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक केला जाणार आहे. योजनेसाठी निवड होणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांने त्या घटकाचा लाभ किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे.दिलेल्या मुदतीत लाभ न घेतल्यास, तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूल केले जाणार आहे.संबंधित शेतकऱ्याचे आधारकार्ड व फार्मर आयडी तीन वर्षांसाठी कृषीच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.