Pune News: शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी कर्जाची रक्कम कपात अथवा वर्ग करू नये, अशी सूचना साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी सर्व साखर कारखान्यांना केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तालयाकडून हे पाऊल उचलण्यात आले..हुतात्मा बाबू गेनू आणि शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साखर आयुक्त कार्यालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर संकुलच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी (ता.१२) करण्यात आले..Farmer Loan Waiver: राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धाडस दाखवावे.त्या वेळी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखाने करत असलेल्या कर्जाच्या रकमेच्या कपातीचा विषयदेखील उपस्थित केला. त्यावर साखर कारखान्यांना तसे करण्यास मनाई करण्याच्या सूचना देत असल्याचे आश्वासन देत साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी तशा आशयाचे पत्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले..दरम्यान, या वेळी साखर आयुक्तालयाच्या नामकरणाची मागणी पुढे रेटत आंदोलकांनी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ ऊस आयुक्तालयाचा फलक लावला. या वेळी पोलिस व आंदोलक यांच्यादरम्यान वादावादी झाली. पण दोन्हीही बाजूंनी हे प्रकरण सामोपचाराने मिटविल्याने तणाव निवळला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.