Parbhani News: शेती व्यवसायात पावलागणिक संकट असतात. यंदा गोदावरी नदीच्या पुरामुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली. त्याच आर्थिक नुकसान भरून निघू शकत नाही. पण त्यामुळे उमेद हारून थोडंच चालणार आहे. सिंचनासाठी पाणी आहे, ही मोठी जमेची बाजू आहे. खरिपाची कसर रब्बीमध्ये भरून काढता येऊ शकते. .त्यादृष्टीने ज्वारी, गहू, हरभरा, कांदा लागवडीचे नियोजन करत आहोत. ज्वारी, गव्हामुळे वर्षेभर पुरेल एवढे घरचे अन्नधान्य होईल. पशुधनाला चारा होईल. हरभरा, कांदा उत्पादनातून नगदी उत्पन्नाची आशा आहे, अशी उमेद लिंबा तांडा (ता. पाथरी) येथील संतोष पवार यांनी जागविली..लिंबा येथील पवार कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. दोन भावांचा नऊ सदस्याचा परिवार आहे. श्री. पवार म्हणाले, की दरवर्षी पावसाने नुकसान होते. परंतु यंदा जास्त आहे. यंदा दोन एकर कपाशी, चार एकर सोयाबीन, पाच एकर ऊस आहे. पिके चांगली बहरलेली असताना गोदावरीच्या पुरामुळे होत्याच नव्हत झालं. शेतकऱ्यांना निसर्गबी अन् सरकारबी मारते. सोयाबीनला हमीभाव मिळत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शासनाचा वचक असावा. कापूस नगदी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे..Rabi Sowing: खानदेशात रब्बी पेरणी १५ टक्के पूर्ण; शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल.कापूस गेला की अर्धा जीव जातो. भाव मिळाला तर शासनाकडे मदतीचा हात पसरायची गरज पडणार नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन कापणीसाठी मजूर मिळत नव्हते. परत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. उरलंसुरलं हातंच जाऊ नये म्हणून वसुबारसेच्या दिवशी पवार कुटुंबातील संतोष, रोहिणी, आरती यांनी स्वतः सोयाबीनची कापणी सुरू केली. कापणी केल्यानंतर शेतात सोयाबीनची गंजी लावली..श्री. पवार म्हणाले, की सोयाबीनचे दाणे, आकाराने बारीक तसेच डागील झाले आहेत. उतारा व बाजारभाव कमी मिळणार पण रब्बीच्या खर्चासाठी पैसा हाती येईल. सिंचनासाठी बोअर आहे. चार एकर हरभरा व गहू तसेच एक एकर कांदा लागवडीचे नियोजन आहे. सुधारित, उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वाणाची लागवड करणार आहोत. दिवाळी होताच पेरणी करणार आहोत..Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू.थंडी चांगली राहिली तर हरभरा, गहू चांगले उत्पादन देऊन जातील. योग्य वेळी केलेल्या पीक व्यवस्थापनावरच शेतीतील उत्पादन, उत्पन्नाचं गणित अवलंबून असतं. खरिपातील उत्पन्नाची कसर काटेकोर व्यवस्थापन करून रब्बीत भरून काढणार आहोत. घरातील सर्व काम करणार आहोत. त्यामुळे मजुरीवरील खर्च वाचेल. तेवढीच रक्कम पदरी शिल्लक राहील..दरवर्षी बाहेरचे मजूर लावून सोयाबीन कापणी करतो. यंदा सोयाबीनच्या एक बॅगच्या कापणीसाठी ४५०० ते ५००० रुपये एवढे दर असूनही मजूर मिळाले नाहीत. त्यामुळे घरीच चार एकर सोयाबीनची कापणी केली. त्यामुळे मजुरीवरील खर्च वाचला. वेळेवर कापणी झाली.संतोष पवार, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.