Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्या तसेच इतर हिंसक प्राण्यांचा वाढता वावर वाढला आहे. अनेक हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतीत जाता येत नसल्याने रब्बीतील शेतीपिकांचे नुकसान होत आहे. .शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतपिके वाचवण्यासाठी विद्युत पंपाला दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘महावितरण’ला निवेदनाद्वारे केली आहे..Farmer Safety: वीजपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, भरत बोरवे, चंद्रकांत पवार, गणेश तोडमल, महेश शेळके, युवराज हजारे यांच्यासह शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे..Solapur Flood: अतिवृष्टीमुळे बाधित ९५ गावांपैकी ७४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत.निवेदनात म्हटले आहे, की अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यासह हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे..शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीसाठी विद्युत पंपाला पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी निवेदनात केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.