Agriculture Update : धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप २५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. काही पिकांचा पेरणी कालावधी संपला असून, काहींचा अंतिम टप्प्यात आहे. .या पार्श्वभूमीवर अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनी आपत्कालीन पीक योजना जाहीर केली आहे. ३१ जुलैपर्यंत आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात कोणत्या पिकांची पेरणी करावी अन् कोणती पिके टाळावीत, याविषयीचा महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे..Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ.दिवसभरात हलक्या सरी, उमरगा कोरडाचधाराशिव जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत सरासरी ५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरला असून, अनेक भागांत हलक्या सरींनी हजेरी लावली. रविवारी दिवसभरात देखील उमरगा वगळता इतर सात तालुक्यांत हलका पाऊस झाला असला तरी खरीप पिके जगविण्यापुरताच तो लाभदायी ठरत आहे..धाराशिव व लोहारा तालुक्यांत सर्वाधिक ८ मिमी, भूम ७.८, कळंब ७, वाशी ३.५, तुळजापूर ३.३, उमरगा १.६, तर परंडा तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, रविवारी दुपारी शहरात १० मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या..Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’.३१ जुलैपर्यंत ही पिके घ्यावीतसूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ.आंतरपिके/आंतरपीक पद्धती : सोयाबीन-तूर, बाजरी-तूर, एरंडी-धने, एरंडी-तूरकोणती पिके घेऊ नयेत : या कालावधीत कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूगऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ही पिके घ्यावीत : संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ. आंतरपिके : एरंडी-धने,एरंडी-तूर. अपरिहार्य परिस्थितीतच धने हे पीक घ्यावे.ही पिके टाळावीत : कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग आणि सोयाबीन यांची पेरणी एक ऑगस्टनंतर अजिबात करू नये..ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यातया पंधरवड्यात उशिरा पेरणीची वेळ आल्यास केवळ अल्पकालावधीची अन् कणखर पिकेच पर्याय ठरतात. या काळात संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी-धने, तसेच एरंडी-तूर ही पिके घेता येतील. तर कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, रागी आणि तीळ यांची पेरणी या काळात करू नये..मागचा अनुभव लक्षात घेता यंदा चारा टंचाईची स्थिती उद्भवू शकते. आता पेरणी केल्यास सोयाबीन, तूर, कपाशीचे उत्पादन अपेक्षित येत नाही. त्यामुळे चारावर्गीय ज्वारी, मका पिकांची निवड केली, तर त्यांचा लागवडीचा खर्च कमी आहे. तसेच चारा आणि धान्यही मिळते. पाण्याची शाश्वत सोय असेल तर ३१ जुलैपर्यंत भारी जमिनीत सोयाबीन-तूर हे आंतरपीक घेता येईल.प्रा. अरुण गुट्टे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.