Beed News : दिवसेंदिवस शेती आतबट्याची होत चालली आहे. त्याची कारणे देखील तशीच आहेत. वाढलेली मजुरी, मजुरांची टंचाई याचा थेट परिणाम बहुभूधारक शेतकऱ्यांवर होत आहे. अन्य पिकांच्या पेरणीवर देखील परिणाम होत असून यावर्षी खरीप हंगामात बाजरीचा पेरादेखील घटला आहे. .तालुक्यामध्ये खरीप लागवडी योग्य ७८ हजार ७७८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५९ हजार ३६४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झालेली आहे. यामध्ये बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचा समावेश आहे. .Bajara Farming : बाजरी पीक जोमात, क्षेत्र राहिले स्थिर .दरम्यान, दिवसेंदिवस शेती करणे जिकिरीचे ठरत आहे. शेतीक्षेत्रात वाढलेल्या यंत्रसामुग्रीने मजूर टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, सर्वच शेतीकामे यंत्रणेवर होत नाहीत. त्यामुळे मजुरांची मागणी वाढते..एवढेच काय तर मागील वर्षीच्या खरीप हंगामात ३५७ हेक्टरवर असलेली बाजरी यावर्षीच्या खरीप हंगामात २२७ हेक्टरवर आली आहे. कारण सोयाबीन, कपाशी व ऊस यासारख्या नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. तर, मजुरांअभावी काढणीस आलेली बाजरी काढणी न झाल्यास पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे..Bajara Farming: राज्यात बाजरीचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरने घटले.उन्हाळी बाजरीवर भरआहारात पावसाळी बाजरीला मोठी मागणी असते. तर गावरान बाजरीचे क्षेत्र खूपच कमी आहे. त्यामुळे अधिकचे पैसे देऊन गावरान बाजरी खरेदी करावी लागते. मजुरांची टंचाई आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी उन्हाळी बाजरी लागवडीवर भर देतात..सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने बहुतांशी शेतकरी हे ऊस, कापूस, सोयाबीन आदी नगदी पिकांकडे वळत आहेत. परिणामी इतर पिकांचा पेरा कमी होत असून अनेक शेतकऱ्यांवर विकतची बाजरी घेण्याची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे बाजरीचा पेरा कमी होत आहे.- बालासाहेब कटके, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.