Sindhudurg News: कोकणातील आंबा, काजू उत्पादक हंगामातील ९० टक्के पीक वाया गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केवळ अडीच हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाने तातडीने या निधीची तरतूद करून घोषणा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली..शेतकरी न्याय हक्क संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार संघ,व्यापारी महासंघ यांच्या वतीने वेंगुर्ला येथे आंबा बागायतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राजेंद्र गड्डयान्नवार, विलास सावंत, काका ढोके, एम.के.गावडे, संजय गावडे, विजय नाईक, विजय प्रभू आदी उपस्थित होते..Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी.श्री.शेट्टी म्हणाले, की उद्योगपतींनी गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बॅँकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे.या सर्व बँकांना रिझर्व्ह बँक भांडवल पुरविते.रिझर्व्ह बँकेत सामान्य करदात्याचा पैसा जमा असतो..Crop Damage Compensation: नुकसान नसतानाही भरपाई यादीत नावे.परंतु आज कोकणातील आंबा,काजू बागायतदार संकटात सापडला आहे.त्यावेळी सरकार त्यांच्या पाठीशी काम उभे राहत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आपली गाठ संवेदनशून्य सरकारशी आहे.हे सरकार शेतकऱ्यांची सावत्र आई आहे.तिला पान्हा फुटण्यासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागणार आहे..आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच आपला हक्क मागायला लागला आहे.आता नुकसानभरपाई घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही.१२ मार्चला वाघाप्रमाणे पंजा मारून हक्क मिळवूया असे सांगत १२ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.