Rice Cultivation Advisory:खरीप भात ज्या भागात भात खाचरामध्ये चिखलणी व पुनर्लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे किंवा उपलब्ध जलस्रोतांमधून आवश्यकतेनुसार पाणी वळवून चिखलणी व पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची पातळी राखता येते, अशा ठिकाणी भात रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवडीसाठी १२ ते १५ सें. मी. उंचीची पाच ते सहा पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत. .भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा. म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते.जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवड १५ सें.मी. × १५ सें.मी. किंवा २० सें.मी. × १५ सें.मी. अंतर ठेवून करावी. लागवड सरळ आणि उथळ (२.५ ते ३.५ सें.मी. खोल) करावी. उथळ लागवड केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात तीन रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावे..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावे. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळे किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांतील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तणनियंत्रण करावे.ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली आहे, पण कमी पावसामुळे खाचरातील पाणीपातळी कमी झाली आहे, अशा ठिकाणी शक्य असल्यास खाचरातील पाणी पातळी २.५ ते ५.० सें.मी.पर्यंत राखावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार नदी, ओढे, विहिरी, शेततळे किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून घ्यावे..पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचे किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावे. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) ५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी, जिथे पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावे. खाचरातील पाणी खेळते राहील असे पाहावे. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता २-३ दिवसांच्या अंतराने फोडून लावावे. नवीन पाणी साठविण्याची व्यवस्था करावी. या किडीची अळी व प्रौढ दोन्ही अवस्था पानांवरील हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. पाणथळ परिस्थिती व नत्र खताचा जास्त वापर या किडीच्या वाढीस पोषक ठरतो. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात, फवारणी प्रति लिटर पाणी.क्विनालफॉस (२५ टक्के ईसी) ४ मि.लि. किंवालॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्का ईसी) ०.५ मि.लि. किंवाकारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के एसपी) १.२ ग्रॅम..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.आंबा, काजू, सुपारी, नारळदमट हवामानामुळे आंबा व काजू पिकामध्ये फांदीमर रोगाचा, तर सुपारीमध्ये ‘कोळेरोग’ आणि नारळ पिकामध्ये कोंबकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.प्रतिबंधात्मक फवारणी (प्रति लिटर पाणी)कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण (१ टक्का)फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर १५ ते २५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी..हळदहळद पिकास लागवडीनंतर दीड महिन्याने पावसाची तीव्रता कमी असताना प्रति गुंठा ८८० ग्रॅम युरिया खताचा पहिला हप्ता द्यावा. खत ओळीच्या बाजूने चर काढून त्यामध्ये टाकावे व त्यानंतर मातीने झाकावे. खतांचा वापर केवळ जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच करावा. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास, जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार खत दिल्यानंतर त्वरित सिंचन द्यावे. खते देण्यापूर्वी तण नियंत्रण करावे..वेलवर्गीय भाजीपालादोडका, लाल भोपळा, दुधी भोपळा व घोसाळी या पिकांची पेरणी केवळ जमिनीत पुरेसा वाफसा असताना किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यावरच करावी.बियाणे पेरणी करताना प्रत्येक आळ्यात २ किलो शेणखत व ५० ते ६० ग्रॅम मिश्रखत मातीत मिसळून देण्यात यावे.रोपावस्थेतील मर किंवा खोडकुज या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति आळ्यामध्ये शेणखतामध्ये मिसळून द्यावे..पडवळ, कारले, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी पिकांमध्ये वेली पसरू लागल्यानंतर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा. वेलींच्या योग्य वाढीसाठी मांडवाची व्यवस्था करावी.नत्र खताची दुसरी मात्रा प्रति वेल १० ग्रॅम युरिया पेरणीनंतर एक महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना देण्यात यावी. मात्रा देतेवेळी गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून मातीची भर द्यावी.खतांचा वापर केवळ जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच करावा. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास, जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार खत दिल्यानंतर त्वरित पाणी द्यावे..(टीप : पावसाची तीव्रता पाहून तीन ते चार तास पावसाची उघडीप असताना फवारण्या घाव्यात. पावसामध्ये कीटकनाशक/ बुरशीनाशक पानांवरून वाहून जाऊ नये, यासाठी द्रावणात स्टिकर (चिकट द्रव्य) मिसळावे. )डॉ. यशपाल चव्हाण ८८०६४०६८५०(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.