Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादकांना शासनाने तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या तुटपुंज्या भरपाईविरोधात शुक्रवारी (ता. १५) गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे दिला.