Akola News: केंद्र सरकारने कर्जमुक्ती, हमीभावासह शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा भारतीय किसान युनियनने दिला आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. .पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या ऐतिहासिक किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारने दिलेली लिखित आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय किसान युनियनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले..Soybean Farmers Protest: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन.यावेळी सुगत भटकर, समाजसेवक गजानन हरणे, विजय देशमुख, गजानन कदम, नंदकिशोर गावंडे, सुरेश घोडके भारत कांबळे, मिलिंद इंगोले, न्यानेश्वर शेळके, धम्मपाल दामोदर , सचिन वानखेडे, अनिल कोकाटे, शेखर साबळे होते..Farmers Protests: वीज आणि बियाणे विधेयकाविरुद्ध पंजाबमधील शेतकऱ्यांचा हल्लाबोल.कर्जमुक्तीचा निर्णय तातडीने घ्यावा. केंद्र सरकारने ११ वर्षांपासून सर्वसमावेशक कर्जमुक्ती केली नसल्याने शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक ओझे वाढले आहे. हमीभाव कायदा लागू करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खात्रिशीर किंमत मिळावी यासाठी हा कायदा तत्कालीन आश्वासनाप्रमाणे लागू करणे अत्यावश्यक आहे. .वीज वितरणाचे खासगीकरण थांबविण्यात यावे. खासगीकरण शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध आहे. शेतकऱ्यांना ३०० युनिट मोफत द्यावी. वीज व शेतीचा वाढता खर्च पाहता मोफत वीजपुरवठा हा काळाची गरज झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.