Maharashtra Farming: राज्यात येत्या खरिपात १४५ लाख हेक्टरवर पेरण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बियाण्यांचा साठा मुबलक असून खत पुरवठादेखील वेळेवर होईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली..खरीप हंगामाच्या राज्यव्यापी नियोजनाची बैठक सोमवारी (ता.२०) सारथी सभागृहात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत कृषिमंत्री बोलत होते. कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक सुनील बोरकर (गुणनियंत्रण), रफीक नाईकवडी (विस्तार), विनयकुमार आवटे (प्रक्रिया व नियोजन), अंकुश माने (फलोत्पादन) उपस्थित होते..Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी.भरणे म्हणाले की, यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशकांचा वेळेत पुरवठा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची काळजी कृषी विभाग घेतो आहे..चालू वर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे खत टंचाई भासू शकते. त्यासाठी राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्यातील ८० लाख शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. खताची साठेबाजी होऊ नये, यासाठी खरिपात योग्य ती काळजी घेण्यात येईल. यात शेतकऱ्यांचे क्षेत्र व त्यांनी घेतलेले पीक यांची काटेकोर नोंद होईल. त्यामुळे दुकानदारांनी जादा खत विक्री करू नये. .Summer Crop Sowing: उन्हाळ पिकांची साडेपंधरा हजार हेक्टरवर पेरणी.यंदा खरिपात १४५ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २० लाख १७ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तर प्रत्यक्षात आपल्याकडे २८ लाख क्विंटल म्हणजे गरजेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी ४८ लाख ८० हजार टन खतांचा पुरवठा मंजूर केला आहे. तर आजअखेर २५ लाख १७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत..मांढरे म्हणाले की, ‘एल निनो’चा प्रभाव पाहता अंदाज घेऊन पेरण्या कराव्यात. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार आहोत. याशिवाय, वैरणविकास कार्यक्रम राबविणार असून ‘एआय’चा जुजबी वापर करण्याचे नियोजन आहे..१५ हजार कृषी निविष्ठा दुकानांची तपासणी होणारराज्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर १५ हजार कृषी निविष्ठा दुकानांच्या तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यापैकी ५ हजार दुकानांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती मांढरे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, दोषी आढळलेल्या १०४ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. पाच दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ७५० दुकानदारांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे. तर ११०० दुकानदारांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.