Jalgaon News : खानदेशात पावसामुळे खरिपातील पिकांची हानी झाली आहे. काही पिके मळणीवर असतानाच पाऊस येत आहे. खरिपात हानीनंतर आता शेतकऱ्यांना रब्बीबाबत अपेक्षा आहे. खानदेशात जलसाठा मुबलक आहे. त्यात रब्बीसाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून पाणी मिळणार आहे. खरिपात पिकांचे मातेरे झाले. आता रब्बीत खरिपातील नुकसानीची भरपाई निघेल, अशी अपेक्षा आहे. .रब्बीतील पिकांची पेरणी अजून सुरू झालेली नाही. पण पावसाची उघडीप मिळाल्यास उडीद, मूग पिकाखाली रिकाम्या झालेल्या व रब्बीसाठी नापेर ठेवलेल्या क्षेत्रात दसऱ्यानंतर पेरणी सुरू होईल. सध्या पाऊस असल्याने पूर्वमशागत, पेरणी, मळणी, कापणी, काढणीची कामे ठप्प आहेत. सोयाबीन, मका पिकाची हानी होत आहे. तसेच यापूर्वी पावसाच्या लहरीपणामुळे मूग, उडीद पिकाला फटका बसला..सर्वच प्रकल्प भरले, विसर्ग सुरूखानदेशात सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्प भरले आहेत. त्यात गिरणा, हतनूर, वाघूर, तोंडापूर, अंजनी, बोरी, अग्नावती, बहुळा, हिवरा, मन्याड, मोर, अभोडा, मंगरूळ, सुकी, धुळ्यातील पांझरा, सोनवद, जामखेली, बुराई, नंदुरबारमधील दरा, देहली, चिरडे, सुसरी आदी प्रकल्पांचा समावेश आहे. त्यातून विसर्गही सुरू आहे..Crop Damage : अमरावतीत दोन लाख हेक्टरवर नुकसान.या सर्वच प्रकल्पांतून पुढे रब्बीला पाणी मिळेल. गिरणा धरणातून मागील हंगामातही रब्बीला पाणीच मिळाले होते. हे धरण मागील वेळेसही १०० टक्के भरले होते. यंदाही हे धरण १०० टक्के भरले. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर, धुळ्यात अनेर, पांझरा या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळणार आहे..Rain Crop Damage : साताऱ्यात अतिवृष्टीचा साडेसहाशे हेक्टरला फटका.पेरणी १०० टक्क्यांवर होणार हरभरा, दादर ज्वारी, मका, भाजीपाला पिके, कांदा, सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात सुमारे ११० टक्के होईल, अशी अपेक्षा आहे. उन्हाळ पिकांचीदेखील पेरणी होणार आहे. सोयाबीन पेरणीचेही नियोजन अनेकांनी केले असून, अडीच लाख हेक्टरपर्यंत जळगाव जिल्ह्यात रब्बीतील क्षेत्र पोचेल, असा अंदाज आहे. ही पेरणी दिवाळीपूर्वी गती घेईल, असे दिसत आहे. त्यात भुईमूग, सूर्यफूल पेरणीही होणार आहे. सोयाबीनचे दर कमी अधिक झाले आहेत. परंतु रब्बीत मका, गहू, ज्वारी पीक परवडत नाही, असेही शेतकरी मानतात. खरिपातील पिके परवडली नाहीत. कापूस उत्पादक जेरीस आले आहेत..मका, गहू वाढणारकापूस पीक घेऊन त्यात मक्याची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र त्यासाठी शेतकरी ऑक्टोबरच्या अखेरीस रिकामे करण्यास सुरुवात करतील. त्यात पूर्वमशागत करून मका व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. गहू पेरणीही यंदा जळगाव जिल्ह्यात सिंचन प्रकल्पातून पाणी मिळणार असल्याने २५ ते ३० हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. मका लागवड जळगाव जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर एवढी होईल, अशी स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.