Beed News : पारध परिसरात पावसाळ्याचे तीन महिने संपूनही जोरदार पाऊस न झाल्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. तसेच परिसरातील धरणे, नदी-नाले कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरीची पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे भविष्यात ५० गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे..शेतकऱ्यांनी उधारी-उसनवारीसह दागिने मोडून खरीप हंगामातील बियाणे, खत, पेरणीसाठी पैशाची तजवीज केली. यंदा सुरवातीपासूनच हलक्या पावसावर खरीपाची पेरणी झाली. पिकेही जोमाने आली; परंतु पेरणीनंतर एकही जोराचा पाऊस पडला नाही. .Water Storage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ प्रकल्प पूर्ण भरले.रिमझिम पावसावर कशीबशी पिके तगली होती. मात्र, आता पावसानेही पाठ फिरविल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, मका, मिरची व इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. .Dam Water Storage: देशातील धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा; सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज.दररोज आकाशात ढग भरून येतात; परंतु जोराचा पाऊस काही पडत नसल्याचे चित्र आहे. सध्या मका, सोयाबीन व इतर पिकांना जोरदार पावसाची गरज आहे. मात्र, हलक्याशा पावसावरच खरिपाची पिके तग धरून आहेत. .काही पिके उन्हामुळे सुकू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत या भागात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे फळबाग, अद्रक, हळद, ऊस आदी पिकांचे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे; परंतु यंदा दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.