Mumbai News: राज्यात आगामी खरीप हंगाम २०२६ साठी खतांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत एकूण खत उपलब्धतेत ३.९९ लाख टनांनी वाढ झाली. मात्र, शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या युरिया खताच्या उपलब्ध साठ्यात १.१५ लाख टनांची घट झाली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. .२५ मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्याला मंजूर एकूण ४८.८० लाख टन खत साठ्यापैकी ५३ टक्के साठा सध्या उपलब्ध झाला आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची शक्यता असून, युरियासाठी रेशनिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे..Fertilizer Stock: राज्यात पुरेसा खतसाठा.कृषी विभागाच्या अहवालानुसार, २५ मार्च रोजी राज्यात एकूण २५.६४ लाख टन खत साठा उपलब्ध आहे. ३१ मार्च २०२५ रोजी हा साठा २१.६५ लाख टन इतका होता. यंदा डीएपी खताचा साठा १.५७ लाख टनाने वाढून २.३८ लाख टनांवर पोहोचला आहे. संयुक्त खतांच्या साठ्यातही ३.६८ लाख टनांची मोठी वाढ झाली आहे..युरियाच्या उपलब्धतेत घट नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी ६.१९ लाख टन असलेला युरियाचा साठा यंदा ५.०४ लाख टनांपर्यंत खाली आला आहे. एमओपी अर्थात पोटॅश खताच्या साठ्यातही ०.४० लाख टनाची घट झाली. सध्या विक्रेत्यांकडे युरियाचा साठा अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसारच त्याची विक्री केली जात आहे..Fertilizer Linking Issue: लिंकिंग फोफावले; कृषी विभाग मात्र संभ्रमात.खरीप नियोजन-मागणीआगामी खरीप हंगामासाठी राज्य सरकारने ४८.८० लाख टन खताच्या वाटपाला मंजूर दिली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा संयुक्त खते (१९.०० लाख टन) आणि युरियाचा (१५.८० लाख टन) आहे. सध्याच्या उपलब्धतेचा विचार करता युरिया ३२ टक्के, डीएपी: ४८ टक्के, एमओपी ५५ टक्के व संयुक्त खते व एसएसपी ६६ टक्के उपलब्ध आहेत. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात खतांचा पुरवठा गतीने झाला..या हंगामात एकूण २८.०२ लाख टन खताची विक्री झाली असून, त्यामध्ये युरियाची विक्री सर्वाधिक १०.९९ लाख टन इतकी झाली आहे. रब्बी हंगामासाठी ३१.३५ लाख टन खतांचे नियोजन करण्यात आले होते, ज्यापैकी २५ मार्चपर्यंत २५.६४ लाख टन साठा शिल्लक आहे..भविष्यातील धोकाखत तुटवड्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम शक्यउत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हेअन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यतापुरवठा साखळी विस्कळित होणारआफ्रिका व आशियातील देशांना सर्वाधिक फटकालहान शेतकऱ्यांपुढे असंख्य अडचणी निर्माण होणारसरकारवर अतिरिक्त अनुदानाचा आर्थिक बोजा पडणार.युद्धामुळे खत पुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी खरीप हंगामासाठी अन्य खते जरी उपलब्ध असली तरी सर्वाधिक मागणी असणाऱ्या युरिया खताचा कमतरता जाणवत आहे.सुनील बोरकर, संचालक, खते व बी बियाणे.‘एलएनजी’ आणि अमोनियाचा पुरवठा सुमारे तीन महिने खंडित राहिल्यास देशांतर्गत युरिया आणि कॉम्प्लेक्स खत उत्पादनात १० ते १५ टक्के घट होऊ शकते. सरकारने युरिया उत्पादकांना ७० टक्के ‘एलएनजी’ देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काहीसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.आनंद कुलकर्णी, क्रिसिल रेटिंग्ज.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.