Crop Insurance: खरीप पीक विम्याचे ८ लाख ६० हजार अर्ज
Kharif 2025: खरीप हंगाम २०२५ मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तब्बल ४.४१ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत ८.६० लाख अर्ज भरून ५.८९ लाख हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळवले आहे. यंदा विमा कवच ३ हजार १८२ कोटींवर पोहोचले असून शेतकऱ्यांनी ६० कोटींचा हप्ता जमा केला आहे.