Rural Water Issue: खानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यांत खडकाळ, मुरमाड जमीन क्षेत्रातील शिवारात टंचाई तयार होत आहे. यात काही धरण क्षेत्रांत उन्हाळ हंगामही यंदा कमी आहे. गिरणा, वाघूर, अनेर, पांझरा सातपुड्यातील उदय आदी नद्यांचे पात्र कोरडेठाक आहे. गिरणा नदीकाठी टंचाई जाणवत असून, काही गावांच्या पाणी योजनांसमोर जलसंकट तयार झाले आहे..गिरणा नदीवर अनेक गावे व पाणी योजना अवलंबून आहेत. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व विविध गावांच्या पाणी योजना गिरणा नदीवर अवलंबून आहेत. नदीत दोन वेळेस टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. परंतु नदीत वाळू नसल्याने पाणी वाहून जाते. वाळू नसल्याने नदीत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे भूगर्भात पाणी कमी आहे. नदीतही पाणीसाठा नसल्याने अडचणी तयार होत आहेत. .Water Scarcity: धरणे भरलेली, तरी दिंडोरीत टंचाईची चाहूल.वाघूर नदीचे पात्रही कोरडे आहे. धुळ्यातील पांझरा नदीदेखील कोरडी असून, साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावातील अमळनेर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजनांना पाणी कमी पडू लागले आहे. तसेच शिवारातही जलसंकट तयार झाले असून, नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. सातपुडा पर्वतात अक्कलकुवा, धडगाव क्षेत्रातील उदय नदीदेखील कोरडी झाली आहे. सातपुड्यातही पाणीटंचाई आहे. पाण्याची काटकसर करण्याची वेळ या भागात आहे. सातपुड्यातून येणाऱ्या अन्य नद्याही कोरड्या झाल्या आहेत. त्यात चोपड्यातील गूळ, यावलमधील मोर, रावेरातील सुकी, भोकर आदी नद्यांचा समावेश आहे..अनेर नदीचे गोटे पडले उघडेधुळे जिल्ह्यात शिरपुरातील अनेर नदी सातपुड्यातून वाहत येऊन सूर्यकन्या तापीला मिळते. उन्हाळ्यातही गारवा देणारी जीवनदायिनी आता उन्हाळ्यात कोरडी पडू लागली असून, पात्रातील दगडगोटे तापून आग ओकू लागले आहेत. अनेर नदीचे मासे जसे पूर्वापार प्रसिद्ध आहेत तसे या नदीतील दगडगोटेही प्रसिद्ध आहेत. .Water Scarcity: पाणी टंचाईसाठी जनजागृती व्हावी : काटकर.१९७३ ते १९७८ च्या दरम्यान अनेर नदीवर गणपूर गावाजवळ धरण उभारण्यात आले. त्यानंतर शिरपूर आणि चोपडा तालुक्यात डावा आणि उजवा कालवा तयार केला. शेतीला पाणी मिळू लागले. पाणी उन्हाळी हंगामासाठी मिळत असे. मात्र, पुढेपुढे ते रब्बीसाठीच मिळू लागले आणि धरणातील पाणी धुळ्यासह अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीसाठा राखीव झाला..उन्हाळ हंगामास अडचणअनेर धरण क्षेत्रात १९८० ते १९९५ पर्यंत उन्हाळी हंगामात भुईमूग पिकत असे. जळगाव, धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त उन्हाळी भुईमूग पीक घेणारा हा पट्टा होता. मात्र, पाणीपुरवठा बंद झाल्याने रब्बीतील पिकेच फक्त शेतकरी घेवू शकतात. भुईमूग इतिहासजमा झाला. मार्चपासून अनेर नदी कोरडी होऊ लागल्याने चोपडा व शिरपूर तालुक्याच्या काही पाणीपुरवठा योजनांना अडचण येऊ लागली आहे. .एप्रिल ते जूनदरम्यान नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका कोरड्या होतात. सद्यःस्थितीत गणपूरपर्यंत नदीची बारीक धार टिकते. मात्र, पुढे भवाळे, गलंगी, घोडगाव, वेळोदे, होळनांथे, भावेर आदी भागात नदीत पाणीच राहत नसल्याने प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.