Jalgaon News : खानदेशात अनेक प्रमुख सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. काही प्रकल्पांत जलसाठा आहे. पण तो शेतापर्यंत पोचू शकलेला नाही. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत हे अपूर्ण प्रकल्प प्रचाराचा मुद्दा ठरतात. .विरोधक निवडणुकीत यासंबंधी प्रचार करून सहानुभूती मिळवितात. पण विरोधक सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पांबाबत पाठपुरावा करीत नाही. सत्ताधारी फक्त निवेदनांचा रतीब लावतात. गिरणा नदीवर खानदेशात एकही मोठा प्रकल्प नाही..Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले.गिरणा धरणाचा जिल्ह्यातील प्रमुख पाच तालुक्यांना लाभ होतो, पण हे धरणही नाशिकमधील नांदगावात आहे. गिरणा नदीवर फडणवीस सरकारच्या काळात वरखेड लोंढे प्रकल्प ९६ टक्के पूर्ण झाला. परंतु त्यात १०० टक्के जलसाठा होत नाही. काही भागात भूसंपादन झालेले नाही..बोदवड योजनेचे भिजत घोंगडेतापी नदीवर जिल्ह्यात फक्त एकच हतनूर हा मध्यम प्रकल्प भुसावळनजीक आहे. हा प्रकल्प तत्कालीन मंत्री मधुकर चौधरी यांच्या काळात पूर्ण झाला. पण याचाही डावा कालवा पूर्ण झालेला नाही. याच भागातील बोदवड उपसा सिंचन योजना रेंगाळत सुरू आहे. तापी नदीवरील जळगाव, यावल तालुक्यानजीकचा शेळगाव बॅरेज प्रकल्पही अपूर्ण आहे. .त्यात फक्त ५० टक्केच जलसाठा करता येतो. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु कालवा व अन्य कार्यवाही पूर्ण झालेली नाही. वाघूर नदीवरील वाघूर प्रकल्प जामनेर, जळगाव, भुसावळसाठी लाभदायी ठरू शकतो. पण त्याच्या बंदीस्त जलवाहिन्यांतून अद्यापही शेतात पाणी पोचलेले नाही. २५ वर्षे हा प्रकल्प अपूर्णच आहे..बलून बंधारे केव्हा हाती घेणार?सात बलून बंधाऱ्यांचा प्रश्नही कायम आहे. मान्यता, मंजुऱ्या, अंतिम अहवाल, अशीच चर्चा याबाबत होते. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व जळगाव या तालुक्यांत हे सात बंधारे मंजूर आहेत. त्यांची चर्चा २००५ पासून सुरू आहे. .Irrigation Project Khandesh : पाडळसे, बुराईसह अनेक सिंचन प्रकल्पांचे भिजत घोंगडे.हा प्रश्नही कधी मार्गी लागेल, असा मुद्दा आहे. भाजपचे एरंडोल क्षेत्राचे तत्कालीन खासदार एम.के.अण्णापाटील यांनी या प्रकल्पाचा विषय पुढे आणला होता. सुरवातीला सुमारे ७०० कोटी रुपये निधी त्यासाठी लागणार होता. आता त्याला १४०० कोटींवर निधीची गरज आहे..पाडळसे प्रकल्पाचे गाजरपाडळसे प्रकल्पाचा उपयोग तब्बल २८ वर्षे सर्वच जण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी करीत आहेत. हा प्रकल्प हाती घेतला त्या वेळी त्याची किंमत सुमारे १२०० कोटी रुपये होती, आता त्यासाठी साडेतीन हजार कोटींवर निधी लागणार आहे. पाडळसे प्रकल्पाचा लाभ अमळनेर, चोपडा, धरणगाव, जळगाव, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर तालुक्यास होवू शकतो. परंतु त्याबाबतही राजकीय अनास्था दिसली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.