Banana Cultivation Delayed: खानदेशात पावसामुळे केळीची लागवड रखडण्याची शक्यता आहे. केळीचे कंद काढणे, त्यांची वाहतूक, रोपांचा पुरवठा आणि लागवड अशी सर्वच कामे पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे पुढील काळात लागवडीस विलंब होणार असून, त्याचा परिणाम पिकाची वाढ आणि नियोजित वेळेत होणाऱ्या काढणीवर होण्याची शक्यता आहे..खानदेशात सध्या उशिराची मृग बहर किंवा अर्ली (आगाप) कांदेबाग केळीची लागवड वेगात सुरू आहे. जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागात लागवड सुरू आहे. मात्र, पावसामुळे अनेक भागांत केळीचे कंद काढण्याचे काम बंद झाले आहे. परिणामी लागवडीची कामेही ठप्प झाली आहेत. कंद पुरवठादारांकडून त्यांच्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कंद काढणी बंद असल्याचे संदेश खरेदीदारांना दिले जात आहेत..Rainfall Deficit: पिके कोमेजू लागली, पावसाचा मोठा खंड .केळीचे क्षेत्र वाढतेयकापूस, ऊस आणि भाजीपाला पिके परवडत नसल्याने तसेच केळीला रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळत असल्याने केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उशिराची लागवडही करीत आहेत. मात्र, सध्याची लागवड रखडल्याने पुढील हंगामालाही विलंब होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सऱ्या पाडून ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी रोपांचा पुरवठाही करून घेतला असून, रोपे शेतातील वातावरणाशी सुसंगत होण्यासाठी ठेवली आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे या रोपांचेही अंशतः नुकसान होण्याची भीती आहे..Crop Damage Surveys: पावसाची तूट असलेल्या भागांत तातडीने पाहणी करून पंचनामे करा; पिके वाचविण्यासाठी १२ तास वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.अनेक जण लागवड टाळणारपुढील सात ते आठ दिवस पाऊस कायम राहिल्यास अनेक शेतकरी केळीची लागवड टाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केळीच्या कंदांनाही उठाव राहणार नाही. परिणामी केळी कंदांचे दर घसरण्याची शक्यता आहे. सध्या जामनेर, रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यांत केळी लागवडीसाठी कंद मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत..पाऊस थांबण्याची प्रतीक्षाकेळीची लागवड, कंद काढणे, कंदांचा पुरवठा आणि रोपांचा पुरवठा यासाठी निरभ्र व कोरडे वातावरण आवश्यक असते. मात्र, शुक्रवारी (ता. ११) रात्री केळी पट्ट्यात पाऊस झाला. त्यातच पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिल्यास केळीची लागवड १० ते १२ दिवस उशिराने करावी लागण्याची शक्यता आहे. .याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. अनेक शेतकरी कंदांची विक्री करीत आहेत. कंद काढून क्षेत्र रिकामे करून त्यात अन्य पिके घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र, पावसामुळे हे नियोजन कोलमडले आहे. कंद काढून क्षेत्र रिकामे करण्यास आणखी विलंब होण्याची स्थिती निर्माण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.