बेळगावातील ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळणहत्तरगी टोल नाक्याजवळ संतप्त आंदोलकांनी जोरदार दगडफेक केल्याने वाहनांचे नुकसानदुसऱ्या एका घटनेत मंत्र्यांच्या कारच्या दिशेने चप्पल आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या.Karnataka Sugarcane Protest: उत्तर कर्नाटकातील, विशेषतः बेळगाव, बागलकोट, हावेरी आणि विजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरुच आहे. येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या ऊस पिकासाठी प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्याची मागणी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे धरणे आंदोलन सुरू झाले होते. आता या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. .येथील आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. दरम्यान, आज शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे बेळगाव जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार दगडफेक केल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. .Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी फुटेना.हत्तरगी टोल नाक्यावर संतप्त झालेल्या आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली. यामुळे सुरक्षा दलांना काही क्षण मागे हटावे लागले. यावेळी अनेक वाहनांचे नुकसान झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत..Sugarcane Price: साखर कारखान्यांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा, काय आहे उसाचा रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला?.मंत्र्यांच्या कारवर चप्पला भिरकावल्यादरम्यान, दुसऱ्या एक घटना मुदलगी तालुक्यातील गुरलापुरा क्रॉस येथे मंत्री शिवानंद पाटील आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आल्यावेळी घडली. संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या कारच्या दिशेने चप्पल आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी घोषणाबाजी केली. .केंद्राने निश्चित केलेल्या सध्याच्या दराने त्यांचा उत्पादन खर्च भरून निघत नाही. तसेच त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी झालेला नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी उसासाठी प्रतिटन ३,५०० रुपये रास्त आणि किफायतशीर दराची (FRP) मागणी लावून धरली आहे..मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्राकडे दाखवले बोटदरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एफआरपी प्रश्नी केंद्राकडे बोट दाखवले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की एफआरपी राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार निश्चित करते. "दरवर्षी केंद्राकडून एफआरपी निश्चित केली जाते. यावर्षीदेखील ६ मे रोजी एफआरपी जाहीर करण्यात आली होती," असे ते म्हणाले. राज्य सरकार केवळ केंद्राचा निर्णय लागू करू शकते आणि शेतकऱ्यांना त्यांची ऊस बिले मिळाली की नाही, याची खात्री करू शकते, असे म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली आहे. त्यांनी साखर कारखानदारांची बैठक बोलावत त्यांच्याशी चर्चा केली आहे..सिद्धरामय्या यांच्या मते, सध्या १०.२५ टक्के उताऱ्यासाठी एफआरपी प्रतिटन ३,५५० रुपये आहे. ज्यात कापणी आणि वाहतूक खर्चाचा समावेश आहे. एफआरपी ही साखर उताऱ्यावर अवलंबून आहे. प्रत्येक ०.१ टक्के बदलासाठी ३.४६ रुपयाने वाढू अथवा कमी एफआरपी होऊ शकते..ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी नेत्यांची एकत्रित बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना महामार्गावरील वाहतूक रोखू नका असे आवाहन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.