Mla Narayan Patil Orders: करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अनेक शेतकऱ्यांचे शेताकडे जाणारे रस्ते अडवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार नारायण पाटील यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. .करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित मातोश्री ग्राम समृद्धी आणि मुख्यमंत्री बळिराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते..Farm Road Issue: मुंगळा येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर.आमदार पाटील म्हणाले की, ज्या गावांत शेतकऱ्यांचे रस्ते अडवले आहेत, तिथे सरपंच आणि पोलिस बंदोबस्तासह जाऊन अतिक्रमण हटवावे. तसेच, या रस्त्यांची नकाशावर नोंद करून ते तत्काळ पुन्हा सुरू करावेत. मतदारसंघातील कोणताही शेतकरी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी नमूद केले. .Farm Road Issue: ‘त्या’ शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या.शेतकरी आणि पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना, प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले..या आढावा बैठकीला प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, माढा तालुक्याचे तहसीलदार संजय भोसले, आदिनाथ कारखान्याचे संचालक देवानंद बागल, राजाभाऊ कदम, माजी सभापती अतुल पाटील, संचालक रविकिरण फुके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.