Maharashtra Farmer Electricity and Water Crisis: ‘‘आमचा शेतकरी राजा उन्हातान्हात राबतोय. सरकार न्यायाधीशांना २० हजार युनिटपर्यंत मोफत वीज देते. आमच्या शेतीला पाणी-वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे जुन्नर तालुका समन्वयक आनंद रासकर यांनी येथे केले..जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने कांदा दराची घरसण, वीज, पाणी प्रश्नी तहसीलदारांना सोमवारी (ता.२५) निवेदन दिले..Onion Farmer Issue: कांद्याने उत्पादकांना रडवले.यावेळी रासकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, तालुका प्रमुख भास्कर गाडगे, शरद चौधरी, माजी नगरसेवक समीर भगत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..Rural Electricity Issue: सिंगल फेजवर डल्ला; ३०० गावे अंधारात.रासकर म्हणाले,‘‘शेतकरी एकीकडे पाण्यावाचून आत्महत्या करत आहेत. शेतीला पाणी नाही, वीज नाही, मात्र ऩ्यायाधिशांना मोफत वीज दिली जाते. वर्षाला चष्म्यासाठी ५० हजार रूपये दिले जातात..या चष्म्यातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकरी आत्महत्या दिसत नसतील, तर त्यांना तो घालण्याचा अधिकार नाही. सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण आहे. आज फक्त आम्ही शेती समस्येचे निवेदन दिले आहे. भविष्यात शेतीप्रश्नांसाठी गाव खेड्यांमध्ये आंदोलन करणार आहोत.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.