Chh. Sambhajinagar News : अति जोरदार पावसामुळे जायकवाडीत आवक वाढल्याने गोदावरी नदी पात्रात रविवारी (ता. १४) सुरू करण्यात आलेला विसर्ग तब्बल १ लाख १३ हजार क्युसेकवर नेला. टप्प्याटप्प्याने तो कमी करत रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पूर्णतः बंद करण्यात आला होता. सोमवारी (ता. १५) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास मात्र पुन्हा जायकवाडीतून निसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता..जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२२ नंतर प्रथमच जायकवाडी धरणाच्या नियमीत १८ व आपत्कालीन ९ दरवाजातून मिळून १ लाखांच्यावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. जायकवाडी (नाथसागर) धरणातून रविवारी (ता. १४) पहाटे ४ वाजता धरण परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे पाणीपातळीत अचानक झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाने टप्याटप्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यास सुरुवात केली. .Dam Water Storage: देशातील धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा; सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज.१२.३० ते १ दरम्यान नाथसागराचे १० ते २७ असे १८ दरवाजे तीन फूट उंचीवर स्थिर करण्यात आले. त्यावेळीं गोदावरी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या ४७ हजार १६० क्युसेक विसर्गामध्ये ९ हजार ४३२ क्यूसेक वाढ करुन तो ५६ हजार ५९२ क्युसेकवर स्थिर करण्यात आला. पहाटे दोन ते अडीच दरम्यान १० ते २७ असे १८ गेट एक फूट अधिक उंचावून विसर्ग ७५ हजार ४५६ कऱण्यात आला. त्यानंतर विसर्ग नियमनासाठी आपत्कालीन दरवाजे १ ते ९ उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या आपत्कालीन दरवाजातून ४ हजार ७१६ क्युसेक विसर्ग वाढवून गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग ८० हजार १७२ क्युसेक करण्यात आला..त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून आपत्कालीन दरवाजे साडेचार फुटांपर्यंत उघडण्यात आले. गोदावरी नदीच्या पात्रातातील विसर्ग तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक कऱण्यात आला होता. सकाळी १० वाजेपर्यंत हा विसर्ग कायम होता. त्यांनतर सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान १० ते २७ हे नेहमीत दरवाजे साडेचार फुटावरून चार फुटावर आणत विसर्ग १ लाख ३ हजार ७५२ क्युसेकवर आणण्यात आला. १०.३० ते १०.४५ वाजे दरम्यान आपत्कालीन दरवाजे अडीच फूट वर आणत एकूण विसर्ग ९९ हजार ०३६ क्युसेक करण्यात आला..सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक ते नऊ आपत्कालीन दरवाजे दीड फूट तर १० ते २७ असे १८ नियमित दरवाजे चार फुट उघडून गोदावरीच्या नदीपात्रात सुमारे ८९ हजार ६०४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास आपत्कालीन नऊ दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले. त्यावेळी नियमित १८ दरवाजातून ७५ हजार ४५६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी करत नाहीत ३७ हजार ७२८ क्युसेक करण्यात आला. .Dam Water Release : दारणा, गंगापूर, पालखेड धरणांतून विसर्गात घट.टप्प्याटप्प्याने हा विसर्ग कमी करत रविवारी रात्री साधारणतः ९:३० ते १० वाजेदरम्यान जायकवाडीतून होणारा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला. विसर्ग बंद करण्याची स्थिती सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कायम होती. .दुपारी बारा ते सव्वा बारा वाजे दरम्यान पुन्हा एकदा जायकवाडीचे अठरा गेट अर्धा फुट उघडून नदीपात्रात ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी साडेबारा ते एक वाजे दरम्यान या विसर्गात वाढ करण्यासाठी गेट एक फुटापर्यंत उघडून विसर्ग १८ हजार ८६४ क्युसेक करण्यात आला. दुपारी तीन वाजता च्या सुमारास पुन्हा एकदा या विसरतात वाढ करून उघडलेले १८ उघडून २८ हजार २९६ पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.