Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९८.६८ टक्के झाला आहे. त्यामुळे जलपातळीच्या नियमनासाठी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ च्या सुमारास १८,८६४ क्युसेकने सुरू होता. तो बुधवारी (ता. २७) सकाळी ३७८२८ क्युसेकने सुरू होता..मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्टला जायकवाडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ९६.३७ टक्के झाला होता. त्यावेळी प्रकल्पात १५,९२० क्युसेकने आवक सुरू होती, त्याच वेळी ४१९२ क्युसेकने गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता..Bhandardara Dam : निळवंडे, भंडारदरा, मुळा धरणांतून विसर्ग सुरू.याचदिवशी सकाळी १० ते १०:३० च्या दरम्यान आधीच्या विसर्गात ५२४० क्युसेकने घट करून तो ४१९२ क्युसेक करण्यात आला होता..बुधवारी सकाळी ३७८२८ क्युसेकने विसर्ग सुरू होता त्यावेळी धरणात १८८३४ क्यूसेक ने आवक सुरू होती. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे दीड फुटावरून दोन फूट उघडून ९४३२ क्युसेक विसर्ग वाढवून तो ३७ हजार ७२८ क्युसेक ने गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.