Unseasonal Rain: सलग दोन दिवस जोरदार वाऱ्यासह आलेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यातील फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळीग्रस्त आंबा बागांची शुक्रवारी (ता. २०) शास्त्रज्ञांनी पाहणी केली..सिंधी काळेगाव (ता.जालना) येथे यासंदर्भात केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की पुढील नुकसान टाळण्यासाठी तत्काळ फळझाडांवर बुरशिनाशकची फवारणी केल्यास बुरशीजन्य रोगाचा बंदोबस्त होण्यास मदत होईल..Mango Orchard Farming: अतिघन आंबा बागेतील फूल-फळ गळतीची कारणे.जिल्ह्यात टरबूज, खरबूज पिकांसह केसर आंबा, मोसंबी या फळपिकांना पावसाने मोठा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे आंबा फळांची गळ झाली आहे..Cashew Orchards Inspection: काजू बागांची शास्त्रज्ञ, कृषी विभागाकडून पाहणी.गारांच्या माऱ्यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांना इजा झाली. अशावेळी झाडाखाली गळून पडलेली फळे बागेबाहेर टाकावीत. तुटून पडलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावावी. इजा झालेल्या ठिकाणी बोर्डोपेस्टचा लेप लावावा. गारपीटग्रस्त फळे तोडून फळझाडांवर बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. .फळझाडांना वाफसा स्थिती ठेवल्यास रोगराई पासून बचाव होण्यास मदत मिळेल. यावेळी आंबा बागायतदार शेतकरी रामभाऊ मोहिते, सीताबाई मोहिते, फळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहायक गिरीश सोनवणे, दिनेश घुगे आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.