Summer Heat: जळगाव तालुक्यात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. जवळपास ४३ अंश सेल्सीअसपर्यंत तापमानात वाढले आहे. शिवारातही शेतीकामे सकाळीच उरकली जात आहेत. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघात सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. .उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहान वैद्यकिय तज्ञांनी केले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांत उष्माघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुपारच्या कडक उन्हात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे,घट्ट कपड्याचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. त्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांनी केले आहे..Heatwave Impact: कडक उन्हामुळे आंब्याला फटका.उष्माघाताची लक्षणेथकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे,भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे,रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षण दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षण दिसू लागताच, रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे रुग्णाचे तापमान खाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत..Heatwave Impact: उष्णतेच्या दाहला योजनेचा मुलामा.रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, आवश्यकतेनुसार सलाईन देणे. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये थांबून नियमित आराम करावा गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे..उष्माघातासाठी स्वतंत्र यंत्रणाखबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयात (जीएमसी) आरोग्य प्रशासन सतर्क आहे. जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयातील जुन्या आयसीयू वॉर्डात दोन बेड, महिला वार्डात दोन बेड, पुरूष वॉर्डात तीन बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. आयसीयू एसी आहे. .इतर ठिकाणी कुलरची व्यवस्था आहे. शरीरात नॉर्मल तापमान ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते. त्यामुळे शरीरातील तापमानापेक्षा जास्त वाढले, तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरातील पाणी संपले, तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने उष्माघात झालेल्या रुग्णावर तातडीचे उपचारासाठी नर्सेस, डॉक्टर, पुरेसा औषधसाठा असल्याचे सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.