Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात २०२४-२५ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना केळीच्या वादळात नुकसानीचे परतावे किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. .मागील वेळेस विमा कंपनीने कमी व अधिक तापमानात नुकसानीसह वादळात हानीसंबंधीचा परतावा एकाच वेळी विमाधारकांना दिला होता. पण यंदा हा परतावा देण्यात आलेला नाही. भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) ही केंद्र शासन पुरस्कृत संस्था फळ पीकविमा योजनेचे कामकाज जिल्ह्यात करीत आहे..Banana Crop Damage : पुरानं सगळं वाहून गेलं, पण आमचा आत्मविश्वास नाही....या कंपनीकडून केळीचे २०२४-२५ च्या हंगामात वादळात नुकसानीचे परतावे प्राप्त झाल्याचे किंवा शेतकऱ्यांना दिल्याचे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही. मागील वेळेस एकाच वेळी सर्व पात्र विमाधारकांना केळीच्या वादळात नुकसानीची भरपाई किंवा परतावे दिले होते. हे परतावा लवकरात लवकर दिले जावेत..Banana Crop Damage : केळी नुकसानीचे पंचनामे सुरूच.तसेच परतावे देताना एका भागाला एक न्याय व दुसऱ्या भागावर अन्याय असा प्रकार करू नका, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. केळीच्या वादळात नुकसानीसंबंधी २०२४-२५ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या १५ हजार विमाधारकांना निधीचे वितरण झालेले नाही..यंदा हे परतावे का दिले नाहीत या बाबत केळी विमाधारकांत संभ्रम आहे. यावर विमा कंपनी, कृषी विभागाने स्पष्टीकरण द्यावे. शेतकऱ्यांची कुठलीही दिशाभूल करू नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. कारण अनेक केळी विमाधारकांना वादळात केळीचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.