Safe Drinking Water: शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठ्याचे लाभ हे केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. अनेक जलजन्य आजार हे शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे रोखले जाणार आहेत..जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यभर कार्यरत पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन मागील सहा-आठ महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत कृती समिती वारंवार पाठपुरावा करूनही विभागाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे येत आहेत. कर्मचारी मग तो कुठल्याही विभागातील असो महिनाभराचे वेतन वेळेत मिळाले नाही, तर त्याचे सर्व आर्थिक नियोजन कोसळते. जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांचे मागील सहा - आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने मुलांचे शिक्षण, घरभाडे, बॅंक कर्ज हप्ते, दैनंदिन गरजा हे सर्व खोळंबले आहे. .Water Conservation: जलसंधारणात हवा प्रत्यक्ष कृतीवर भर.एवढेच नाही तर बहुतांश कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. तीन ऑगस्टपर्यंत थकीत मानधन न मिळाल्यास मुंबईत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यस्तरावर निधी उपलब्ध असल्याचा दावा पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी कृती समिती करीत आहे. अशा वेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांना तत्काळ मिळायला हवे. गावागावांत स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि आरोग्याचा संदेश पोहोचविणाऱ्यांच्याच घरात आर्थिक असुरक्षिततेची छाया असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे..त्याचबरोबर जलजीवन मिशन व ‘स्वच्छ भारत मिशन’मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे. मार्च २०२७ पर्यंतच्या वेतनासाठी आवश्यक निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करून देणे, मागील संप काळातील थकीत मानधनही अदा करावे, या त्यांच्या मागण्याही रास्त म्हणाव्या लागतील..जलजीवन मिशनच्या मागील वर्षभराच्या कामावर दृष्टिक्षेप टाकला तर चांगले काहीच घडताना दिसत नाही. कुठे जलजीवन मिशनच्या कामांचे चुकीचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामे रखडलेली आहेत. काही ठिकाणी पाइपची चोरी झाली आहे, तर अनेक ठिकाणच्या जलजीवनच्या कामात अनियमितता, गैरप्रकारांच्याही तक्रारी असून, त्याबाबत ‘एसआयटी’ चौकशीची मागणीदेखील होत आहे. .Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!.ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे लोकांना जुलाब, उलटी, विषमज्वर, कावीळ, हगवण, अतिसार हे आजार होतात. त्यामुळे औषधोपचार, आरोग्यसेवा यावर खर्च होतो. अनेकदा व्यक्ती मृत्युमुखी पडून संपूर्ण कुटुंब कोलमडते. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व घरांना २०२४ पर्यंत स्वच्छ, पुरेसे पाणी (प्रतिदिन, प्रतिव्यक्ती किमान ५५ लिटर) नळाद्वारे पोहोचविणे, हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट होते, जे अजूनही पूर्ण झालेले नाही. शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठ्याचे लाभ हे केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. जलजन्य आजार हे शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे रोखले जाणार आहेत. यामुळे कुपोषणसुद्धा रोखण्यास मदत होणार आहे..अशुद्ध पाणी, कमी पाणी यामुळे स्वच्छतेच्या अपुऱ्या सोई आणि अनारोग्याला निमंत्रण मिळते. जल जीवन मिशनमुळे हे टाळले जाईल, त्याचे अप्रत्यक्ष लाभही अनेक आहेत. आजही देशाच्या बहुतांश भागात चांगल्या पाऊसमान वर्षातही उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते तर कमी पाऊसमान काळात तर पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था असते. पाण्यासाठीची मैलोनमैल पायपीट महिलांना करावी लागते. .परंतु जलजीवन मिशनच्या घरोघरी नळ योजनेमुळे संपूर्ण देशभरातील महिलांची ही पायपीट थांबणार आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जलजीवन मिशन अंतर्गतच्या कंत्राटी कामगारांच्या सर्वच मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. शिवाय या मिशनअंतर्गतच्या सर्व अनियमितता, गैरप्रकारही तत्काळ दूर होतील, ही काळजी देखील घ्यायला हवी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.