Mumbai News: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ पासून निधी प्राप्त झाला नसल्याने ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांवर विपरित परिणाम झाला असून ही कामे मंदावली आहेत..तसेच, या योजनेसंदर्भातील मागण्यांची पूर्तता न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे, अशी माहिती अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता. १६) विधानसभेत दिली..Jal Jeevan Mission: 'जल जीवन'साठी केंद्राकडून निधीच नाही, २५ हजार काम ठप्पे.राज्यातील ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे बंद असल्याबाबत नाना पटोले, अमिन पटेल, अस्लम शेख, ज्योती गायकवाड, विश्वजित कदम आदी आमदारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी लेखी उत्तरातून हा खुलासा केला..पाटील यांनी आपल्या उत्तरात म्हंटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पामध्ये ‘जल जीवन मिशन’चा कालावधी डिसेंबर २०२८ पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्या १६ जून २०२५ च्या पत्रान्वये ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमास डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्याचे विचाराधीन आहे..Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’च्या ‘त्या’ कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाका.त्याचप्रमाणे पाणी हा विषय राज्य सूचीअंतर्गत येत असल्याने जोपर्यंत केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत राज्यांनी स्वतःच्या निधीमधून ‘जल जीवन मिशन’च्या योजनांची अंमलबजावणी सुरू ठेवण्याबाबत कळविले आहे. .‘जल जीवन मिशन’अंतर्गत राज्यात एकूण ५१,५६० योजना समाविष्ट असून त्यापैकी २६,४९९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २५,०६१ योजनांची कामे विविधस्तरांवर प्रगतिपथावर असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे..... कामांची संथगती कायम!‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत राज्यास २०१९-२० ते आतापर्यंत एकूण ३६,२६९.५७ कोटी रुपये (राज्याचा हिस्सा २०,५३६.५६ कोटी रुपये व केंद्राचा हिस्सा १५,७३३.०१ कोटी रुपये) निधी प्राप्त झाला. .ही योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि कामांवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सप्टेंबर २०२४ पासून केंद्राचा हिस्सा मिळालेला नसतानाही राज्य शासनाने २०२४-२५ व २०२५-२०२६ या वित्तीय वर्षांमध्ये विशेष बाब म्हणून अनुक्रमे २,४८३.५८ कोटी रुपये आणि २,३४८.२९ कोटी रुपये असा एकूण ४,८३१.८७ कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. अर्थात, तरीही कामांवर विपरीत परिणाम झाल्याचे पाटील यांनी कबूल केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.