डॉ. अतिश पाटीलसिंचनामुळे पिकांचे उत्पादन वाढते, मातीची सुपीकता टिकते. परंतु सिंचनाच्या पाण्याचा अयोग्य किंवा अतिवापर आणि क्षारयुक्त पाण्यामुळे पिकांवर गंभीर दुष्परिणाम होतात. जमिनीवर आणि पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य वेळी तसेच शास्त्रीय पद्धतीने सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे..पाणी हे शेतीचा मूलभूत घटक आहे. जागतिक गोड्या पाण्याचा सुमारे ७० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. बियाण्यांची उगवण, प्रकाशसंश्लेषण, पिकांची वाढ आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी पिकांना पाण्याची गरज असते. सिंचनामुळे पिकांचे उत्पादन वाढते, मातीची सुपीकता टिकते. परंतु सिंचनाच्या पाण्याचा अयोग्य किंवा अतिवापर आणि क्षारयुक्त पाण्यामुळे पिकांवर गंभीर दुष्परिणाम होतात. यामध्ये जमिनीची क्षारता वाढून पिकांची वाढ खुंटणे, मुळे कुजणे, अन्नद्रव्यांचे वाहन व शोषण्यास अडथळा, उत्पादनात घट, पाणी साचल्यामुळे पिकांची पाने पिवळी पडणे आणि मातीचे आरोग्य बिघडणे या प्रमुख समस्या उद्भवितात. जमिनीवर आणि पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य वेळी तसेच शास्त्रीय पद्धतीने सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे..Water Testing: प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले कृष्णा नदीतील पाण्याचे नमुने.पाण्याच्या अतिवापराचे पिकांवर होणारे दुष्परिणामपाण्याच्या अतिवापराने जमिनीतील क्षार भूपृष्ठावर येतात. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. सिंचनाच्या क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पिकांना पाणी व अन्नद्रव्ये शोषण्यास त्रास होतो, पिकांची पाने जळतात आणि पिके पिवळी पडून कोमेजतात. पिकांची वाढ खुंटते.जास्त पाण्यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही, उपयुक्त जिवाणू नाश पावतात. परिणामी, पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. पिकांची मुळे कुजतात, प्राणवायूची कमतरता निर्माण होते. तसेच जमिनी चिबड बनतात..खराब दर्जाचे पाणी पिकास आवश्यक पोषक अन्नद्रन्यांचे शोषण करण्यापासून रोखते. ज्यामुळे पीक योग्य प्रकारे जीवनक्रम पूर्ण करू शकत नाहीत.जास्त ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोग आणि तणांचे प्रमाण वाढते, त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी येते.अतिरिक्त पाण्यामुळे फुलांची व फळांची गळती होऊन पिकांच्या अंतिम उत्पादनात मोठी घट होते..Akola Water Testing : अकोला जिल्ह्यात जलस्रोत तपासणीची मोहीम सुरू.पाण्याच्या अतिवापराचे जमिनीवर होणारे दुष्परिणामपाण्याच्या अतिवापरामुळे चांगल्या सुपीक जमिनीचे रूपांतर समस्यायुक्त व नापीक जमिनीत होते.सततच्या सिंचनामुळे जमिनीच्या खालची पाणी पातळी वाढते. जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे चांगल्या जमिनीचे रूपांतर पाणथळ जमिनीत होते.अतिरिक्त पाण्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वरच्या थरात येतात. पाणी सुकल्यावर हेच क्षार वरती साचतात, जमीन क्षारपड बनते.जास्त पाण्यामुळे मातीचे कण एकमेकांना घट्ट चिकटतात, ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही. यामुळे जमिनी कडक होतात, जमिनीची भौतिक संरचना बिघडते, मुळांची वाढ खुंटते. जमिनीतील आवश्यक पोषक अन्नद्रव्ये पाण्यासोबत वाहून जातात. त्यामुळे परिसरातील जलसाठ्यात रासायनिक प्रदूषण वाढते.अतिरिक्त सिंचनामुळे मातीची धूप होते, ज्यामुळे वरचा सुपीक थर वाहून जातो. पाणथळ जमिनीत हवा नसल्यामुळे, मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळ मरून जातात, ज्यामुळे जमिनीची नैसर्गिक उत्पादकता नष्ट होते. .सिंचनाच्या पाण्याचे परीक्षणसिंचनासाठी वापरले जाणारे पाणी पिकांसाठी योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी पाणी परीक्षण अत्यंत गरजेचे आहे. यामुळे जमिनीत क्षार जमा होणे रोखणे, जमिनीचा पोत सुधारणे आणि पिकांची योग्य वाढ सुनिश्चित करणे शक्य होते.पाणी परीक्षण हे क्षारयुक्त पाणी, रासायनिक खतांचा वापर आणि मातीची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. पाणी परीक्षणामध्ये प्रामुख्याने पाण्याचा सामू, क्षारता आणि कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराइड, सल्फेट, सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि बोरॉन यांसारख्या क्षार घटकांचे प्रमाण तपासले जाते. पाण्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोराइड व सल्फेट या उदासीन क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन भुसभुशीत वाटते, परंतु पिकांच्या मुळांची वाढ खुंटून पिके पिवळी पडतात. तसेच पाण्यामध्ये सोडिअम क्षार कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटसारख्या अणुबरोबर असल्यास जमिनीची घडण अतिशय कठीण होते. त्यासाठी पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्षार आहेत हे समजल्यास त्यावर उपाययोजना करणे सोपे जाते..Water Testing : एफटीके किटद्वारे आता गावोगावी पाण्याची तपासणी.पाण्याच्या विविध स्रोतांची क्षारतास्रोत क्षारता (डेसी सायमन प्रति मीटर)पावसाचे पाणी ०.०१ ते ०.०५नदीचे पाणी ०.०५ ते ०.३०विहिरीचे पाणी ०.५० ते १२.०कूपनलिकेचे पाणी ०.५० ते १२.०.पाणी नमुना घेण्याची पद्धतनदी आणि ओढे यातून पाण्याच्या नमुना घ्यावयाचा असल्यास तो वाहत्या पाण्यामधून प्लॅस्टिक बादली व दोरीच्या साह्याने घ्यावा. पाण्यावर तरंगणारी घाण, काडीकचरा आणि शेवाळ बाजूला करावे. कोणतीही घाण नमुन्यामध्ये नसावी. पाणी स्वच्छ कपड्यातून गाळून घ्यावे. पाण्याच्या नमुना घेण्यासाठी स्वच्छ प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीचा वापर करावा. प्रथम बाटली त्याच पाण्याने ३ ते ४ वेळा धुवावी.विहीर आणि कूपनलिकेतून पाण्याचा नमुना घ्यावयाचा असल्यास प्रथम विद्युत पंप १० ते १५ मिनिटे चालू ठेवावा. त्यामुळे पंपामध्ये साचलेले पाणी निघून जाईल.प्रयोगशाळेत तपासणीसाठी एक लिटर पाणी पुरेसे होते. पाणी नमुना बाटलीवर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पाण्याचा स्रोत, नमुना घेतल्याची तारीख ही माहिती लिहावी. पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत ४८ तासांच्या आत तपासणीसाठी पाठवावा. तणनाशक, कीटकनाशक व विविध रसायने यांच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर पाणी नमुना घेण्यासाठी टाळावा..Water Testing : अनेक गावे धोक्याच्या उंबरठ्यावर.जास्त क्षारतेचे पाणी जेव्हा सिंचनासाठी वापरले जाते तेव्हा आपोआप जमिनीची क्षारता सुद्धा वाढू लागते. उदा. उसाला पाण्याच्या २० पाळ्या (क्षारता १.० डेसीसायमन प्रति मीटर) दिल्या, तर जमिनीत एकूण ३८४ × २० = ७६८० किलो क्षार प्रति हेक्टर मिसळतात. ऊस, केळी यासारख्या नगदी पीक क्षेत्रामध्ये चांगल्या सुपीक जमिनी क्षारपड बनत आहेत..सिंचनाचे पाणी क्षारयुक्त होण्याची कारणेनगदी पिकांसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा, वापर करणे.सिंचन क्षेत्रात आढळणाऱ्या खडकाचा प्रकार.चिकणमाती असणार्या जमिनीतून निचऱ्याचा अभाव असणे. एकच पीक वारंवार घेणे.रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करणे.क्षारयुक्त विविध पाण्याचे स्रोत..क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा. पिकांची लागवड वरब्यांच्या बगलेत करावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उतारास चर खोदावी. सरीमध्ये काडी कचरा, पिकांचे अवशेष, भुसा व पाचट ई. आच्छादन टाकावे. पेरणीच्या वेळी बियाणे शिफारशीपेक्षा १५ ते २० टक्के जास्त वापरावे. नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त करावा. पिकांना हलके, वारंवार, परंतु मर्यादित पाणी द्यावे. सिंचनासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा..चांगले पाणी खारवट पाण्यात ठरावीक प्रमाणात मिसळून द्यावे. एका आड एक सरी भिजवावी.पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांची मात्रा ३.१२ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असल्यास ठिबक सिंचन करावे.क्षार सहनशील पिकांची निवड करावी.पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर निलगिरी, बांबू लागवड करावी.- डॉ. अतिश पाटील, ९९२२८१७०१८(विषय विशेषज्ञ (मृद् विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, धुळे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.