डॉ. मेधा जगताप Preventive Farming Practices: कापूस पिकातील कीड, रोग तसेच तण नियंत्रणासाठी केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून न राहता एकात्मिक उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात केली जाणारी मशागत ही सोपी, कमी खर्चिक आणि परिणामकारक पद्धत आहे. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये उन्हाळी मशागत हा अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ही पद्धत तणांची संख्या कमी करते. आणि पुढील हंगामातील तण नियंत्रण अधिक सुलभ होते. .कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापूस पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत तणे पिकासोबत पाणी, अन्नद्रव्ये, प्रकाश व जागा यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे उत्पादनात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये शेताची उन्हाळी मशागत हा अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ही पद्धत तणांची संख्या कमी करून पुढील हंगामात तण नियंत्रण सुलभ करते. उन्हाळी मशागत ही एकात्मिक कापूस व्यवस्थापनाचा पाया मानली जाते. केवळ रासायनिक तणनाशकावर अवलंबून न राहता पारंपरिक, यांत्रिक व रासायनिक पद्धतींचा अवलंब केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते..Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.उन्हाळी मशागत ही एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक पोषण व्यवस्थापन आणि एकात्मिक तण नियंत्रण यांची सुरूवात मानली जाते. योग्य पीक फेरपालट, प्रतिकारक्षम वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय खताचा वापर यांसोबत उन्हाळी मशागत केल्यास कापूस पिकाची वाढ निरोगी होऊन उत्पादनक्षमता वाढते..कापूस-तण स्पर्धेचा संवेदनशील काळकापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे तण नियंत्रणासाठीच्या सर्व उपायोजनांचा एकत्रित व शाश्वत वापर करणे. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये यांत्रिक, जैविक, पारंपरिक आणि रासायनिक उपाययोजनांचा समावेश होतो. एकात्मिक तण व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढते आणि तणांची तणनाशकांप्रती प्रतिकारशक्ती कमी होते. कापूस हे पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच ४५ ते ६० दिवसांपर्यंत तणांच्या स्पर्धेला अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे या कालावधीत विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर शेताची उन्हाळी मशागत ही एक प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पद्धत ठरते..कापूस पिकातील महत्त्वाची तणेएकदल तणे ः हराळी, दूर्वा, नाचणी तण.द्विदल तणे ः घोळ, तांदुळजा, माठ.तृणवर्गीय तणे ः नागरमोथा..उन्हाळी मशागतीचे महत्त्वकापूस पिकाची सुरुवातीच्या काळातील वाढ ही अत्यंत संथ गतीने होते. कापूस पिकातील लागवडीचे अंतर मुळातच जास्त असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तणांची पिकासोबत पाणी, अन्नद्रव्ये, प्रकाश आणि जागा यासाठी स्पर्धा वाढते. त्यामुळे मुख्य कापूस पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन पीक उत्पादनात मोठी घट येते. वास्तविक पाहता तणांचे अस्तित्व (बीज रूपात किंवा कायिक रूपात) हे कापसाच्या टोकणीपूर्वीच असते. .तणांचे बियाणे पिकांच्या बियाण्यापूर्वीच उगवण, मुळे वाढणे, कायिक वाढ होणे या बाबींसाठी पिकांसोबत अधिक जोमाने स्पर्धा करतात. यासाठी एप्रिल-मे महिन्यांत कडक उन्हात शेतीची खोल उन्हाळी मशागत करणे आवश्यक ठरते. त्यामुळे जमिनीतील तणांच्या बी, मुळे, कंद, खोडे इत्यादी जमिनीच्या पृष्ठभागावर उघडे पडून उन्हामुळे नष्ट होतात. परिणामी, पुढील हंगामात तणांची उगवण कमी प्रमाणात होते..Cotton Planning Technology: सघन लागवड तंत्रज्ञानाने कापसाचे उत्पन्न वाढवावे.विशेषतः नागरमोथा, गाजर गवत, माठ तसेच सावळी यांसारख्या तणांचे प्रमाण उन्हाळी मशागतीमुळे लक्षणीयरीत्या कमी होते. उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानाचा योग्य उपयोग करून शेताची खोल नांगरणी केल्यास जमिनीतील विविध कीड आणि रोगांच्या अवस्था उघड्या पडतात. त्यामुळे त्या देखील नष्ट होतात. यामुळे पुढील हंगामात कापूस पिकावरील कीड-रोगांचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी होतो. विशेषतः गुलाबी बोंड अळी, अमेरिकन बोंड अळी तसेच ठिपकेदार बोंड अळी यांसारख्या प्रमुख किडींच्या अळ्या व कोष अवस्था जमिनीत राहतात. उन्हाळी मशागतीमुळे या अवस्थेतील कीड सूर्यप्रकाशत उघडी पडून नष्ट होते..उन्हाळी मशागतीचे फायदेजमिनीतील सुप्त अवस्थेतील तण बियाणे जमिनीवर येऊन उघडे पडतात. सूर्यप्रकाश व उष्णतेमुळे ते नष्ट होतात.बहुवार्षिक तणे जसे की हराळी, नागरमोथा, दूर्वा आदी तणे मुळासकट वर येऊन ती कोरड्या उन्हात सुकून मरतात.उन्हाळी मशागतीमुळे जमिनीतील किडीच्या अवस्था, अळ्या जमिनीवर उघड्या पडतात. प्रखर उन्हामुळे किडीच्या अवस्था आणि बुरशी नष्ट होतात..जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीचा भुसभुशीतपणा वाढून जमिनीची रचना सुधारते. पावसाचे पाणी मुरण्यास मदत होते.उत्पादन खर्चात बचत होते. रासायनिक तणनाशकांवरील अवलंबित्व कमी होऊन पुढील हंगामात तणनाशकाची गरज कमी भासते.सेंद्रिय अंशांचे विघटन वेगाने होऊन पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.पिकाची वाढ निरोगी आणि जोमदार होते. त्यामुळे कापसाचे उत्पादन व दर्जा सुधारतो..उन्हाळी मशागतीची कामेएप्रिल-मे महिन्यांत तापमान जास्त असताना खोल नांगरणी करावी. शक्य असल्यास जमिनीची २० ते २५ सेंमी खोलवर मशागत करावी.नांगरणीनंतर ८ ते १० दिवस शेत उन्हामध्ये तापू द्यावे. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त परिणाम होईल.आवश्यकता भासल्यास दुसरी उभी- आडवी नांगरणी करावी..कॉटन श्रेडरचा वापरकॉटन श्रेडर या यंत्राद्वारे कापूस पीक निघाल्यानंतर पिकाचे शेतात उरलेले पीक अवशेष जसे खोड-काड्या लहान तुकड्यांमध्ये कापल्या जातात. यालाच कापूस-पऱ्हाटी कुटी यंत्र असेही म्हणतात. कापूस पिकानंतर शेतात मोठ्या प्रमाणात काडीकचरा शिल्लक राहतो. हा कचरा जाळण्याऐवजी कॉटन श्रेडर मशिनने बारीक करून जमिनीत मिसळल्यास मातीची सुपीकता वाढते आणि उत्पादन खर्चही कमी होतो..फायदेमातीची सुपीकता वाढते.पिकांचे अवशेष व्यवस्थापन.रासायनिक खतांवरील खर्च कमी.सिंचनाच्या पाण्यात बचतवेळ व मजुरी खर्चात बचत..पुढील पिकांसाठी सेंद्रीय खताची उपलब्धता.प्रभावी तण नियंत्रण.मातीच्या धुपीवर नियंत्रण.- डॉ. मेधा जगताप,९८३४९ ८९५८१(कापूस संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.