Amaravati News: हवामानावर आधारित संत्रा फळपीक विमा योजना २०२४–२५ अंतर्गत आंबिया बहार संत्रा पिकाच्या विमा परताव्यासाठी तब्बल सात महिने प्रतीक्षा करावी लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ३,०१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १७ कोटी २६ लाख ८८ हजार ११० रुपये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहेत..रब्बी हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत विमा परतावा जाहीर करणे अपेक्षित असताना, ‘ट्रिगर लागू नाही’ असे कारण देत विमा कंपनीकडून परतावा नाकारण्यात आला होता. या अन्यायाविरोधात माजी आमदार देवेंद्र भुयार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रूपेश वाळके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आंदोलन छेडले..Rabi Crop Insurance: तेत्तीस हजार शेतकऱ्यांनी भरला ६४ कोटींचा विमा.मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन करत शासन व विमा कंपनीचे लक्ष वेधण्यात आले. तसेच १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता..Orange Crop Insurance: आंबिया बहर संत्रा फळपिकासाठी विमा योजना.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ डिसेंबर रोजी संबंधित विमा कंपनीला तातडीने विमा परतावा वितरित करण्याचे निर्देश दिले..यानंतर प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर आवश्यक माहिती अद्ययावत करून १६ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मोबाइलवर संदेश प्राप्त होताच संत्रा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.