Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत केळी बागांचे मार्च ते जून या कालावधीत वादळी पावसात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संबंधित भागात वाऱ्याचा वेगच नव्हता, नुकसान झालेले नसल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. या तक्रारी विमा कंपनीने बेदखल केल्याने अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील, अशी स्थिती आहे. .आपल्या केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत, असा आरोप अनेक शेतकरी करीत आहेत. विमा कंपनीला वाऱ्याचा वेग व अन्य माहिती एका खासगी कंपनीकडून प्राप्त होते. या कंपनीचे हवामान केंद्र सर्वत्र नाही. ८७ महसूल मंडलांत ही केंद्रे आहेत. यात काही केंद्रांभोवती झाडे, भिंती आहेत. .Crop Insurance Issue: पीक कापणी प्रयोगानंतर आता विमा भरपाईस दिरंगाई .काही केंद्रांत तापमान, वाऱ्याच्या वेगाच्या नोंदी व्यवस्थित होतात की नाही, हादेखील मुद्दा आहे. अशात कमी तापमानासंबंधी अनेक महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या हंगामात परतावे मिळणार नसल्याची स्थिती आहे. फक्त ३६ मंडलांतील शेतकरी परताव्यांसाठी पात्र ठरले..Crop Insurance Issue : पीककर्जासाठी परळी तहसीलसमोर निदर्शने.तक्रारींचे पंचनामेही झालेअशातच वादळात नुकसान भरपाईसंबंधीदेखील शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यावरही विमा कंपनीने कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप आहे. .या तक्रारी केल्यानंतर विमा कंपनी प्रतिनिधी मात्र संबंधित भागात जोरदार वाऱ्याची नोंदच नाही तर पंचनामे व पाहणी कशी करू, अशी बतावणी करीत होते. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, लोकप्रतनिधींनी याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.