India Sugar Production Expected To Rise: इथेनॉलसाठी होणाऱ्या वापराव्यतिरिक्त २०२५-२६ मधील हंगामात देशातील साखर उत्पादन १३ टक्क्यांनी वाढून २.९६ कोटी टन होण्याचा अंदाज आहे. पण साखर निर्यात परवानगी कोट्यापेक्षा कमी म्हणजेच ८ लाख टन राहील, असे ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (AISTA) म्हटले आहे. .या संघटनेने आपल्या पहिल्या अंदाजात म्हटले आहे की, या साखर हंगामात निव्वळ साखर उत्पादन २०२४-२५ मधील २.६२ कोटी टनाच्या तुलनेत अधिक असेल. वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेतील अडचणींमुळे मागील हंगामातील ३४ लाख टनांच्या तुलनेत यंदा इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे, असे संघटनेने म्हटले आहे. .साखरेचा ४७ लाख टनांचा सुरुवातीचा साठा आणि २.९६ कोटी टन उत्पादन धरल्यास, देशात एकूण साखर उपलब्धता ३.४३ कोटी टन इतकी राहील. हा साखर साठा अंदाजित २.८७ कोटी टनांच्या देशांतर्गत वापरापेक्षा अधिक असेल, असे AISTA ने नमूद केले आहे..Sugar Production: साखर उत्पादन २२ टक्के वाढले, कारखाने आर्थिक दबावाखाली, विक्री दरावरून 'इस्मा'कडून चिंता व्यक्त .केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली असली तरी, शुगर ट्रेड संघटनेच्या अंदाजानुसार, २०२५-२६ मधील वर्षात साखरेची प्रत्यक्ष निर्यात ८ लाख टनच होईल. यामुळे हंगामाच्या शेवटी ४८ लाख टन साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे..Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री.महाराष्ट्रातील उत्पादन वाढणारदेशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन १.०८ कोटी टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यातील मागील हंगामातील ८१ लाख टनांच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन अधिक असेल, असे 'एआयएसटीए'ने म्हटले आहे..देशातील दुसरे सर्वात मोठे उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन ९३ लाख टनांवरून ९४.१ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर कर्नाटकातून ४३ लाख टनांवरून ४९.१ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे..गाळप हंगाम फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहील महाराष्ट्रातील गाळप हंगाम फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. परंतु पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन कारखान्यांचा आणि जालना तसेच लातूरमधील बहुतांश कारखान्यांचा हंगाम कालावधी वाढू शकतो, असे संघटनेने म्हटले आहे..गुळाला असलेली जोरदार मागणी तसेच अधिक चांगल्या दरांमुळे अपेक्षेपेक्षा अधिक गुर्हाळ घरांना पुरवठा करण्याकडे कल दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे..उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे सहारनपूर आणि बिजनौर जिल्ह्यांत खोडवा ऊस पीक उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. पण साखरेचा उताऱ्यात सुधारणा होऊन तो मागील हंगामातील १०.६५ टक्क्यांच्या तुलनेत १०.९ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे..'एआयएसटीए'कडून सांगण्यात आले आहे की ते फेब्रुवारीमध्ये त्यांचा दुसरा उत्पादन अंदाज जाहीर करतील. भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.