India Dam Update: देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये ९६.९६६ अब्ज घनमीटर म्हणजेच उपयुक्त क्षमतेच्या ५२.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा ७२.११ टक्के होता. दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सध्याचा साठा ९७.१३ टक्के असून, तो सरासरीपेक्षा २.८७ टक्के कमी आहे. केंद्रीय जल आयोगाच्या ६ ऑगस्टच्या साप्ताहिक अहवालातून ही स्थिती समोर आली आहे..देशातील पाणीसाठ्याची विभागवार स्थितीत मोठी तफावत दिसून येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोव्याचा समावेश असलेल्या पश्चिम भारतातील ५३ धरणांत ७५.८६ टक्के साठा असून, तो सरासरीपेक्षा ३३.९५ टक्के अधिक आहे. याउलट दक्षिण भारतातील ४७ धरणांमध्ये ४६.४७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात दक्षिण भारतातील साठा ७७.९६ टक्के होता..मध्य भारतातील जलाशयांमध्ये ४७.३८ टक्के, तर उत्तर भारतात ४५.८० टक्के पाणीसाठा आहे. हे दोन्ही विभाग सरासरीच्या खाली आहेत. पूर्व भारतातील जलाशयांमध्ये ४७.१९ टक्के साठा असला, तरी तो सरासरीपेक्षा १०.३६ टक्के अधिक आहे..Maharashtra Dam: राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग.मराठवाड्यात धरणनिहाय मोठी तफावतमराठवाड्यात मात्र धरणनिहाय पाणीसाठ्यात मोठी तफावत आहे. जायकवाडी धरणात ९३.०१ टक्के साठा असला, तरी माजलगावमध्ये केवळ १८.३३ टक्के आणि मांजरा धरणात १६.३८ टक्के पाणी आहे. येलदरी धरणात ५९.२२ टक्के, तर इसापूरमध्ये ६२.१३ टक्के साठा आहे. या दोन्ही धरणांतील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे..तेलंगणात सर्वाधिक गंभीर स्थितीदक्षिण भारतात तेलंगणातील स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. राज्यातील आठ प्रमुख धरणांमध्ये केवळ २०.९२ टक्के पाणीसाठा असून, तो सरासरीपेक्षा ५४.९८ टक्के कमी आहे. देशातील प्रमुख राज्यांचा विचार करता ही सर्वाधिक घसरण आहे. नागार्जुन सागरमध्ये केवळ ३.१५ टक्के म्हणजे ०.१६१ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हे धरण ९६.५३ टक्के भरलेले होते. तमिळनाडूतील अलियार धरणातील साठा शून्यावर आला आहे. राज्यातील नऊ प्रमुख धरणांमध्ये एकूण ३४.३८ टक्के पाणीसाठा आहे. कर्नाटकातील धरणांमध्ये ५७.६२ टक्के, तर केरळमध्ये ४७.६९ टक्के साठा उपलब्ध आहे..Maharashtra Dam: राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग.११ धरणांत निम्म्याहून कमी पाणीकेंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील ११७ धरणांमध्ये दहा वर्षांच्या सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. उर्वरित ४९ धरणांमध्ये सरासरीच्या ८० टक्के किंवा त्याहून कमी साठा आहे. यापैकी ११ धरणांमध्ये सरासरीच्या निम्म्याहूनही कमी पाणी आहे..खोरेनिहाय विचार करता तापी, साबरमती, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, महानदी, ब्राह्मणी आणि बैतरणी नदीखोऱ्यांतील पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगला आहे. गंगा, सिंधू, माही, नर्मदा, कृष्णा आणि पेन्नार खोरी सरासरीच्या जवळ आहेत. महानदी ते पेन्नार दरम्यानच्या पूर्ववाहिनी नद्या, कावेरी, तद्री ते कन्याकुमारी दरम्यानच्या पश्चिमवाहिनी नद्या आणि बराक खोऱ्यात मात्र साठ्याची स्थिती कमी आहे..महाराष्ट्रातील धरणांत ८५.८४ टक्के साठामहाराष्ट्रातील ३५ प्रमुख धरणांमध्ये (६ ऑगस्टपर्यंत) ८५.८४ टक्के पाणीसाठा असून, तो सरासरीपेक्षा ३०.५२ टक्के अधिक आहे. भाटघर आणि पानशेत धरणे १०० टक्के भरली आहेत. चासकमानमध्ये ९९.७७ टक्के, खडकवासला ९९.८४, उजनी ९८.८०, तर कोयना धरणात ९३.५१ टक्के पाणीसाठा आहे. विदर्भातील पेंच धरणातही ९३.२१ टक्के साठा उपलब्ध आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.