यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलेपीक क्षेत्र वाढल्याने देशातील धान्य उत्पादनात सुधारणा होण्याची शक्यतापण बंपर पीक उत्पादन होणार नाहीअतिवृष्टीमुळे महाराष्ट्र, पंजाबमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान .Foodgrain Production: यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिले. तसेच पीक क्षेत्रात वाढ झाल्यामुळे या आर्थिक वर्षात देशातील धान्य उत्पादनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण काही राज्यांत अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा बंपर पीक उत्पादन होणार नसल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे..२०२५-२६ मध्ये धान्य उत्पादन ३६२.५० दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २.४ टक्के अधिक असेल, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच सांगितले होते..Foodgrain, Vegetable Inflation: धान्य, भाजीपाला महागला; पण शेतकऱ्यांना फायदा होतो का?.मे महिन्यात कृषी मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात २०२४-२५ मध्ये ३५३.९६ दशलक्ष टन एवढे विक्रमी धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य झाले. जे २०२३-२४ मधील ३३२.३० दशलक्ष टनांच्या तुलनेत २१.६६ दशलक्ष टनांनी अधिक आहे. ही वाढ सुमारे ६.५ टक्के आहे..देशात भात, गहू, मका, भुईमूग आणि सोयाबीन सारख्या प्रमुख पिकांमधून विक्रमी उत्पादन मिळाले. हे उत्पादन ३४१.५५ दशलक्ष टन उद्दिष्टापेक्षा १२.४१ दशलक्ष टनांनी अधिक होते..Ai in Agriculture: शेतकरी, रेस्टॉरंट अन् कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी क्रांती.२०२५-२६ मधील खरीप हंगामात भात, कडधान्ये, भरडधान्ये, तेलबिया, ऊस आणि कापूस पीक क्षेत्र सुमारे १११ दशलक्ष हेक्टरवर विस्तारले आहे. खरीप हंगामात सामान्यपणे पिकाखालील क्षेत्र १०९.६ दशलक्ष हेक्टरवर असते. यात १.३६ टक्के वाढ झाली आहे. यात मुख्यतः भात, कडधान्ये, भरडधान्ये आणि ऊस पिकाखालील क्षेत्राचा अधिक समावेश आहे..दरम्यान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आदी राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा खरीप हंगामातून बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. पण खरीप हंगामात पीक क्षेत्रात वाढ झाल्याने, उत्पादन कमी, अधिक प्रमाणात मागील हंगामाएवढेच राहील, असा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना व्यक्त केला आहे. .महाराष्ट्रात सोयाबीन, मका, कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसानपंजाब आणि हरियाणात भात आणि कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राजस्थानमध्ये मूग, गवार आणि बाजरी पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. मध्य प्रदेशात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. तर महाराष्ट्रात सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग या प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे..खरीप हंगामाप्रमाणेच, कृषी विभागाला रब्बी हंगामात चांगल्या पीक पेरणीची अपेक्षा आहे. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान रब्बी पीक पेरणी केली जाते. तर मार्च- एप्रिल दरम्यान पीक कापणी करण्यात येते. रब्बीतील प्रमुख पिकांमध्ये गहू, कडधान्ये, तेलबिया, भरडधान्ये आणि भात यांचा समावेश आहे. २०२४-२५ मध्ये एकूण रब्बी पीक पेरणी क्षेत्र सुमारे ६६.१ दशलक्ष हेक्टरवर होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.