Washim News: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा शासनाचा तसेच (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय, आधुनिक पीक पद्धती आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. .संगमनेर पॅटर्न हा यशस्वी शेती विकासाचा नमुना असून, तो जिल्ह्यात राबविल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढेल, असे (कै.) वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले..Farmer Income: २०४७ पर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत वाढविणार.मानोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, चिया लागवड, दुग्ध व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते..Farmer Income: मध्यस्थांना वगळून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा शेतमाल, केंद्राकडून हॉटेल्सना आवाहन.अॅड. पाटील यांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या चिया आणि दुग्ध व्यवसायावर भर दिला. मानोरा तालुक्यात किमान १००० हेक्टरवर चिया लागवडीचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. .तसेच शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय व पूरक उद्योगांना चालना द्यावी, तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत कारखेडा गावचे सरपंच, नागरिक व पत्रकार उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.