Maharashtra Monsoon : जळगाव पावसाचा खंड आणि उष्णतेमुळे उडीद पिकाचे नुकसान होत आहे. उडीद पीक पक्व होत असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पीक हाती येईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे..खानदेशात उडीद पिकाचे क्षेत्र कमी होत आहे. अनेकदा पाऊस लांबल्याने पेरणी उशिरा होते. पेरणीनंतरही पावसाचा खंड पडतो. तसेच पीक काढणीला आले की पाऊस सुरू होतो. या कारणांमुळे शेतकरी उडीद पिकाकडे पाठ फिरवत आहेत. उडदाऐवजी मका आणि सोयाबीनच्या पेरणीला अनेक शेतकरी पसंती देत आहेत. यंदा जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात उडदाचे अपेक्षित क्षेत्र सुमारे १६ हजार हेक्टर आहे. मात्र, यंदा पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. खानदेशात एकूण सुमारे २० हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली आहे. यंदा पिकाची स्थिती समाधानकारक नाही. पावसाचा खंड पडल्याने फुले गळून पडली. त्यानंतर जेमतेम शेंगा लागल्या. काळ्या कसदार जमिनीत मात्र पीक काही प्रमाणात तग धरून आहे..Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?.शेंगा होताहेत पक्वअनेक भागांत काळ्या कसदार जमिनीत उडीद पिकातील शेंगा पक्व होत आहेत. त्यांची काढणी आणि मळणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी पावसाची गरज आहे. पोळा सणाच्या सुमारास पावसाचे पुनरागमन झाल्यास तो नवरात्रोत्सवापर्यंत सुरू राहतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे पुढे पाऊस सुरू राहिल्यास उडदाचे पीक हाती येईल की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. कमी पावसामुळे काही भागांत उडीद पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी ते वखरून काढले आहे..Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.वाफसा स्थिती नाहीशीउडदाची पेरणी सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात झाली आहे. हलक्या आणि मध्यम जमिनीत उडीद पिकाची वाढ खुंटली आहे. काळ्या कसदार जमिनीत मात्र पिकाची स्थिती तुलनेने चांगली आहे. पुढील काळात कापणीचे काम सुरू होईल. मात्र, त्याच वेळी पाऊस सुरू झाल्यास कापणी आणि त्यानंतर मळणी करणे शक्य होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे..अनेक शेतकरी पीक जमिनीत गाडण्याच्या तयारीतपावसाचा खंड पडल्याने अनेकांचे उडीद पीक हातचे गेल्यात जमा आहे. शेंगांची संख्या कमी असल्याने अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कापणी आणि मळणीचा खर्चही परवडणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक शेतकरी उडीद पीक शेंगांसह जमिनीत गाडण्याच्या तयारीत आहेत. वयामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. त्यानंतर केळी, पपई किंवा अन्य रब्बी पिके घेता येतील. पुढील पिकांची पेरणीही वेळेत करता येईल, असे शेतकरी सांगतात. काही शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद पीक पिवळे पडले असून त्यावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. हे पीक जमिनीत गाडल्यास रोगकारक घटक जमिनीत राहून पुढील पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काही शेतकरी शेतात मोठा खड्डा करून त्यात उडीद पीक गाडण्याचे नियोजन करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.