डॉ. अतिश पाटील, डॉ. पंकज पाटील, डॉ. जगदीश काथेपुरीCotton Disease: कपाशीचे पीक हिरवेगार असतानाच अचानक कोमेजणे, पाने पिवळी पडणे आणि काही दिवसात झाड वाळणे अशी समस्या काही शेतांमध्ये दिसून येते. या अवस्थेला आकस्मिक मर म्हणतात. त्यामुळे सरसकट बुरशीनाशकाची फवारणी करतात, परंतु हे चूक आहे. .आकस्मिक मर ही तापमान, पाण्याचा ताण, शेतात साचलेले पाणी आणि असंतुलित खत व्यवस्थापन अशा विविध कारणांमुळे उद्भवू शकते. त्यामुळे कारण ओळखूनच उपाय करणे महत्त्वाचे आहे. पाणी आणि खत व्यवस्थापन, योग्य फवारण्या करुन आकस्मिक रोगावर नियंत्रण मिळवता येते..Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?.आकस्मिक मरची कारणेदिवसाचे तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणे, पावसाचा मोठा खंड पडणे, पाण्याचा ताण येणे किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यामुळे कपाशीच्या झाडावर ताण येतो.पाण्याचा योग्य निचरा नसणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे, एकाच शेतात सतत कपाशीची लागवड करणे आणि खतांचा असंतुलित वापर हीदेखील आकस्मिक मराची कारणे ठरू शकतात.काही परिस्थितीत फ्युजेरियम विल्ट, व्हर्टिसिलियम विल्ट किंवा चारकोल रॉट या बुरशींचाही प्रादुर्भाव असू शकतो..लक्षणे काय?आकस्मिक मरामध्ये सुरुवातीला झाड सकाळच्या वेळी ताजेतवाने दिसते. मात्र दुपारचे ऊन वाढल्यानंतर ते अचानक कोमेजू लागते. त्यानंतर पानांचा रंग फिका होऊन पाने पिवळी पडतात आणि खाली झुकतात. पीक फुलोरा किंवा बोंड धरण्याच्या अवस्थेत असल्यास फुले आणि लहान बोंडे गळू शकतात. पुढे झाडाची वाढ थांबून संपूर्ण झाड वाळते.तसेच झाडाच्या खोडाचा उभा छेद घेतल्यानंतर आतील भाग तपकिरी किंवा काळसर दिसत असेल किंवा मुळे कुजलेली असतील, तर बुरशीजन्य मराची शक्यता असते..Cotton Root Rot: पावसानंतर कपाशीला मुळकुजचा धोका, लक्षणे दिसताच करा तातडीने उपाय.पाणी आणि खत व्यवस्थापन महत्त्वाचेपावसानंतर शेतात पाणी साचू देऊ नये. अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा. याउलट पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील ओलावा पाहून ८ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन द्यावे. माती परीक्षणानुसार मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.झाडांवर शारीरिक ताणाची लक्षणे दिसल्यास १.५ किलो युरिया अधिक १.५ किलो सल्फेट ऑफ पोटॅश (पांढरा पोटॅश) १०० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणाची १५० ते २०० मिली मात्रा प्रति झाड बुंध्याजवळ द्यावी..त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात मिसळून त्याचे १५० ते २०० मिली द्रावण प्रति झाड मुळाजवळ द्यावे, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील मृद विज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. अतिश पाटील, पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. पंकज पाटील आणि कृषिविद्या विषय विशेषज्ञ श्री. जगदीश काथेपुरी यांनी दिला आहे..बुरशीजन्य मरबुरशीजन्य मराची लक्षणे आढळल्यास जैविक व्यवस्थापनासाठी फुले ट्रायकोडर्मा हार्झियानम २.५ किलो प्रति एकर किंवा स्यूडोमोनास फ्लोरेसेन्स २.५ किलो प्रति एकर किंवा फुले सुपर बायोमिक्स ४ किलो प्रति एकर शेणखतात मिसळून किंवा ठिबकद्वारे द्यावे.प्रादुर्भाव जास्त असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी २.५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी एका द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी..डॉ. अतिश पाटील, विषय विशेषज्ञ, मृद विज्ञान, ९९२२८१७०१८डॉ. पंकज पाटील, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण,श्री. जगदीश काथेपुरी, विषय विशेषज्ञ, कृषिविद्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, धुळे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.