Lashkari Ali Niyantran: सध्या अनेक भागांत रब्बी मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र अलीकडच्या ढगाळ हवामानात, वाढलेल्या आर्द्रतेत आणि अवकाळी पावसामुळे मक्याच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणजे लष्करी अळी. योग्य वेळी या किडीची ओळख व नियंत्रण शेतकऱ्यांनी केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते..ढगाळ हवामान पोषकढगाळ वातावरणात तापमान मध्यम राहते आणि आर्द्रता जास्त असते. अशी परिस्थिती लष्करी अळीच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते. त्यामुळे या काळात अळी झपाट्याने वाढते आणि कमी वेळेत संपूर्ण शेतात पसरू शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे..Maize Armyworm: फवारण्या करुनही मक्यावरील लष्करी अळी आटोक्यात का येत नाही?.अळीची ओळखलष्करी अळ्या सुरुवातीला समूहाने राहतात आणि कोवळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत पानांवर पांढरे ठिपके दिसतात. नंतर अळ्या वेगवेगळ्या होतात आणि पोंग्यामध्ये शिरून पाने खातात. तिसऱ्या ते पाचव्या अवस्थेत जातात तेव्हा पानांवर छिद्रे दिसतात. सहाव्या अवस्थेत अळी फारच खादाड बनते आणि पोंग्यात लाकडाच्या भुशासारखी विष्ठा टाकते. तसेच कणसाच्या आवरणाला छिद्र पाडून आतले दाणेही आधाशासारखे खाते..नियमित सर्वेक्षणाची गरजलष्करी अळीचे नुकसान टाळायचे असेल तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नियमित शेत सर्वेक्षण. मक्याची पाने, पोंगे आणि कणसाच्या आजुबाजूचा भाग काळजीपूर्वक तपासावा. सुरुवातीच्या अवस्थेत अळी ओळखली गेली तर नियंत्रण सोपे आणि खर्च कमी होते. उशीर झाल्यास नुकसान वाढते आणि नियंत्रण कठीण होते..कामगंध सापळ्यांचा वापरलष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. सापळ्यांमध्ये सलग २ ते ३ दिवस भुंगेरे आढळल्यास त्वरित फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच पोंग्यांवर छिद्रे दिसू लागताच तातडीने नियंत्रण उपाय सुरू करावेत..एकात्मिक व्यवस्थापनफक्त फवारणीवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन वापरणे अधिक प्रभावी ठरते. मोठ्या अळ्या दिसताच त्या हाताने उचलून नष्ट कराव्यात, अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. शेतात हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत. फवारणी करताना ती थेट मक्याच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी. तसेच पोंग्यात वाळू मिसळलेली राख टाकल्यास अळी नियंत्रणात येण्यास मदत होते..प्रादुर्भावाची टक्केवारी कशी ओळखावी?शेतातील १०० झाडांपैकी ५ झाडांवर अळी दिसली तर तो ५ टक्के प्रादुर्भाव समजावा. मोठ्या शेतात वेगवेगळ्या ठिकाणांहून १०० झाडांची तपासणी करून ही टक्केवारी काढावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.