डॉ. प्रकाशकिरण पवारमागील लेखात आपण पिकाच्या पाण्याच्या गरजेवर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करतानाच त्याचा योग्य प्रमाणात वापर करण्याचे महत्त्व जाणून घेतले. या लेखात आपण पिकांच्या पाण्याची गरज कशी निश्चित करायची, याच्या सोप्या आणि महत्त्वाच्या पद्धतींची माहिती घेऊ..पिकांची पाण्याची गरज म्हणजेच पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाची निरोगी वाढ आणि चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागणारे एकूण पाणी.पिकाचा प्रकार आणि त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार कमी अधिक पाणी आवश्यक असते. विशेषतः पिकांची उगवण, वाढ, फुलोरा, फळधारणा आणि आकार व वजन वृद्धीसाठी पाणी अत्यावश्यक असते. जमिनीचा प्रकार, हवामानातील विविध घटक आणि सिंचन पद्धती यानुसारही पिकांची पाण्याची गरज बदलते. पिकांची पाण्याची गरज काढताना आपण जमिनीतून होणारे बाष्पीभवन आणि पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन काढतो..Fruit Crop Water Management : कमी पाण्यात फळबागेचे नियोजन कसे कराल ?| ॲग्रोवन.पिकांची पाण्याची गरज = पीक वापरते ते पाणी + जमिनीतून उडून जाणारे पाणी.हे पाणी साधारणपणे पाण्याची जमिनीपासूनची उंची (मिलिमीटर, सेंटीमीटर, किंवा मीटर), पाण्याचे प्रमाण (लिटर प्रति झाड, किंवा घनमीटर प्रति झाड); किंवा पाण्याची उंची प्रति जमिनीचा आकार (मिलिमीटर प्रती एकर, सेंटीमीटर प्रती एकर, मिलिमीटर प्रती हेक्टर ई.) किंवा पाण्याची प्रमाण प्रति जमिनीचा आकार (लिटर प्रती एकर, घनमीटर प्रती एकर, घनमीटर प्रती हेक्टर ई.) या शास्त्रीय परिमाणांमध्ये दर्शविले जाते..पिकांची पाण्याची गरज ठरवण्याच्या प्रमुख पद्धतीपाण्याची गरज निश्चित करण्यासाठी शेतकरी, सिंचन अभियंते, शास्त्रज्ञ, विस्तार अधिकारी किंवा विस्तार संस्था यांच्याकडून प्रामुख्याने पुढील पद्धतीचा वापर केला जातो.अ) पिकाचे निरीक्षण : ही सर्वात सोपी आणि सर्वात जुनी पद्धत आहे. यात पिकाचे बारकाईने निरीक्षण करून त्याला पाण्याची गरज आहे की नाही, हे ठरविले जाते.पाने सुकणे किंवा पिवळी पडणे : जर पिकाची पाने दुपारच्या वेळी (उन्हानामध्ये) सुकणे किंवा मलूल पडायला लागली किंवा त्यांचा रंग फिका पडून पिवळसर दिसू लागला, तर याचा अर्थ त्याला पाण्याची गरज आहे.पाने सुरकतणे किंवा पाने गुंडाळणेवाढ खुंटणे : पुरेसे पाणी न मिळाल्यास पिकाची वाढ खुंटते आणि ते अशक्त दिसते.जमिनीला सूक्ष्म भेगा पडणे : जर तुमच्या शेतातील जमिनीला लहान भेगा पडल्या असतील, तर जमिनीतील ओलावा कमी होत चाललेला आहे आणि पिकाला पाण्याची त्वरित गरज आहे हे ओळखावे..Fruit Crop Water Management : कमी पाण्यात फळबागेचे नियोजन कसे कराल?.ही अतिशय सोपी आणि कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ निरीक्षणावर व अनुभवावर आधारीत पद्धत आहे. मात्र त्याची अचूकता व्यक्ती दर व्यक्ती बदलू शकते. परिणामी कधी कधी नुकसान होऊ शकते.ब) पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी – पद्धतपिकाची पाण्याची आवश्यकता ही त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलते, असे आपण म्हणत असलो तरी त्यात त्या भागातील जमिनीचा प्रकार, सिंचन पद्धती आणि हवामान यानुसारही अनेक बदल होऊ शकतात. एकदा पिकाची लागवड केली की जमीन आणि सिंचन पद्धत एकच राहते. एकदा त्याचा अचूक अंदाज आला की हवामानाच्या बदलानुसार आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्याव्या लागणाऱ्या पाण्यामध्ये अचूकता आणू शकतो. यासाठी हवामानाबाबत सतत अपडेट राहून अभ्यास आणि संयमाने नियोजन करावे लागते.पिकाला उगवण कालावधीमध्ये साधारणपणे कमी ते मध्यम पाणी लागते. वाढीच्या अवस्थेमध्ये मध्यम पाणी लागते. फळधारणा किंवा / दाणे भरण्याच्या अवस्थेत जास्त पाणी लागते, तर पक्व अवस्थेमध्ये कमी पाणी लागते. हे लक्षात ठेवून पाण्याचे नियोजन करता येते..क) जमिनीतील ओलावा अनुभवणे / तपासणे (Soil Moisture Feel Method)ही एक व्यावहारिक पद्धत असून, शेतकरी अनुभवाने व सरावाने तज्ज्ञ होऊ शकतो. पद्धत१. आपल्या शेतातील पिकामध्ये सुमारे ६ ते १२ इंच खोलीवरून (पिकाच्या मुळांच्या खोलीवर) थोडी माती घ्यावी.२. या मातीचा गोळा तयार करण्याचा प्रयत्न करावा. त्याचे निरीक्षण करावे.त्या मातीचा गोळा तयार झाला आणि तो तसाच राहिला, तर जमिनीत पुरेसा ओलावा आहे.जर मातीचा गोळा तयार झाला नाही आणि माती लगेच भुसभुशीत झाली, तर जमिनीत पाण्याची कमतरता आहे.जर मातीचा गोळा खूप घट्ट झाला आणि हाताला चिकटली, तर जमिनीत जास्त पाणी आहे.ही पद्धत खूप सोपी असली तरी अचूकता येण्यासाठी अनुभव व सराव लागतो. ही पद्धत सर्व ठिकाणी योग्य ठरेलच असे नाही..Fruit Crop Water Management : कमी पाण्यात फळबाग कशी जगवाल?.ड) मातीतील ओलावा उपकरणाने मोजण्याची पद्धतमातीचा ओलावा प्रत्यक्षपणे मोजला जातो किंवा माती म्हणजेच मातीतील कण (घन पदार्थ), जल बिंदू (द्रव पदार्थ), आणि हवा (वायू पदार्थ) यांच्या विविध गुणधर्मांचा वापर करून मातीतील पाण्याचा अप्रत्यक्षपणे अंदाज घेतला जातो.मातीचा ओलावा प्रत्यक्षपणे मोजणे : ज्या कारणासाठी ओलावा मोजायचा आहे, त्यानुसार एक किंवा अनेक ठिकाणांचे किंवा खोलीवरील मातीचे नमुने घेतले जातात. त्यांचे वजन अचूकपणे मोजून घेतात. त्यानंतर ते नमुने विद्युत ड्रायरमध्ये सुकविले जाते. ओल्या मातीचे वजन आणि सुकलेल्या मातीचे वजन यातील फरकावरून मातीमधील ओलावा मोजला जातो. कमी नमुने व अधिक अचूकतेची आवश्यकता असलेल्या बहुतांश शास्त्रीय संशोधनांत ही पद्धत वापरली जाते. ही अचूक असली तरी त्यासाठी जास्त श्रम करावे लागतात. तसेच या प्रक्रियेत वेळ जात असल्याने ओलाव्याची माहिती थोडी उशिरा कळू शकते..सेन्सर्सद्वारे मातीचा ओलावा अप्रत्यक्षपणे मोजणेवातावरण, माती आणि पाणी यांच्या विविध गुणधर्मांचा वापर करून मातीतील ओलाव्याचा अंदाज घेतला जातो. त्यासाठी विविध प्रकारचे संवेदकांचा वापर केला जातो. या संवेदकांमध्ये वापरले गेलेले धातू आणि संवेदकाची सभोवतालच्या मातीमधील पकड यांच्यावर संवेदकाची अचूकता अवलंबून असते..Rabi Water Management: आठ धरणांतून रब्बी पिकांसाठी आवर्तन सुरू.इलेक्ट्रोमॅग्नेटिक (EM) लहरी मोजणारे सेन्सर्स : मातीत असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर मातीमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे प्रमाण ठरत असते. त्याला इंग्रजीमध्ये अचूकतेने डायइलेक्ट्रिक परमिटिव्हिटी असे म्हणतात. या पद्धतीमध्ये मातीतून विद्युत चुंबकीय लहरींचा प्रसार करतात. मातीच्या डायलेक्ट्रिक परवानगीनुसार लहरींचा वेग किंवा वारंवारिता बदलते. या बदलानुसार मातीमधील पाण्याचे प्रमाण ठरवले जाते..काही संवेदक हे आकारमानानुसार पाण्याचे प्रमाण दर्शवितात. त्याला व्हॉल्यूमेट्रिक वॉटर कंटेंट म्हणतात. कॅपेसिटन्स, टाइम डोमेन रिफ्लेक्टोमेट्री (TDR), फ्रिक्वेन्सी डोमेन रिफ्लेक्टोमेट्री (FDR) असे या तत्वावर चालणाऱ्या संवेदकांचे प्रकार आहेत. यांची अचूकता जास्त असली तरी वापरण्यासाठी तज्ज्ञता व कौशल्याची आवश्यकता असते. ही पद्धत खूप खर्चिक आहे. ज्या वेळी अनेक ठिकाणांवरून पाण्याच्या प्रमाणाची माहिती आवश्यक असते त्यावेळी या पद्धतीस मर्यादा येतात. परंतु एकाच ठिकाणी वेगवेगळ्या खोलीवरून माहिती घेण्यासाठी ही पद्धत उपयोगी आहे..विद्युत प्रतिकार/वाहकता मोजणारे सेन्सर्स : या पद्धतीमध्ये मातीत दोन प्लेट, धातूच्या तारा (इलेक्ट्रोड), किवा प्रोब बसविले जातात. या दोन प्रोबमधील विद्युत प्रतिकार किंवा वाहकता मोजली जाते. पाणी वाहकता वाढवते म्हणजेच प्रतिरोध कमी करते. रेझिस्टिव्ह सेन्सर्स बहुतेकदा वापरले जातात. हे सेन्सॉर तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असतात. परंतु यांना प्रथमतः तुमच्या जमिनीच्या प्रकारासाठी कॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. यातील संवेदकांवर जमिनीतील रासायनिक प्रक्रियेचा आणि तापमानाचा प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांची अचूकता कमी होत जाते. याबाबत अधिक माहिती आपण पुढे पाहणारच आहोत..मातीच्या पाण्याचा ताण (मॅट्रिक पोटेंशियल) मोजणारे सेन्सर्स : मातीचे कण जलबिंदूना एक विशिष्ट ऊर्जेने धरून ठेवतात. पिकांच्या मुळांना हे जलबिंदू शोषून घेण्यासाठी ताण लावावा लागतो. पाण्याची उपलब्धता जेवढी कमी तेवढा जास्त ताण लावावा लागेल. हा ताण वनस्पतींना उपलब्ध असलेले पाणी दर्शवतो. या मध्ये दोन प्रकारची उपकरणे वापरली जातात. टेन्सिओमीटर या उपकरणात सच्छिद्र सिरॅमिक कप, पाण्याने भरलेली नळी आणि व्हॅक्यूम गेज वापरतात. तर दुसऱ्या उपकरणात मातीत ठेवलेल्या जिप्सम ब्लॉक्स मध्ये दोन धातूचे इलेक्ट्रोड (तारा) असतात. त्यातील प्रतिकार मोजतात. या उपकरणांची अचूकता कमी असून, त्यांची देखभाल आणि काळजी घ्यावी लागते. - डॉ. प्रकाशकिरण पवार९५८६६७६५८(फक्त १० ते ६ या कार्यालयीन वेळेमध्ये संपर्कासाठी.)(लेखक ग्रीन प्रॉस्पॅरिटी इनोव्हेशन्स या सिंचनविषयक कंपनीचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.