Kanda chawl: सध्या रब्बी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. पुढील ४ ते ६ महिन्यांसाठी शेतकरी रब्बी कांद्याची साठवण करतील. त्यामुळे ती योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. बहुतेक शेतकरी कांद्याची साठवण चाळीतच करतात. परंतु साठवण जर योग्य पद्धतीने केली नाही, तर कांदा सडणे, कोंब उगवणे किंवा वजन घटणे अशा घटना घडतात. त्यामुळे चाळीची योग्य रचना आणि साठवण व्यवस्थापन गरजेचे आहे. .तापमान आणि आर्द्रताकांदा साठवताना तापमान आणि आर्द्रता यांचा योग्य समतोल असणे आवश्यक आहे. चाळीतील आर्द्रता ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कांद्याला बुरशी लागून तो सडतो. तर आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास कांद्याचे वजन घटते. त्यामुळे ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान राखणे योग्य ठरते. हे वातावरण टिकवण्यासाठी चाळीची रचना योग्य असणे महत्त्वाचे आहे. यासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. प्रांजली गेडाम यांनी माहिती दिली आहे..Rabi Onion Harvesting: उन्हाळ्यात रब्बी कांद्याची काढणी आणि काढणीपूर्व नियोजन कसे करावे?.चाळीसाठी अनुदानराज्यात कांदा चाळींची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी शासन काही योजना राबवते. शेतकऱ्यांना कांदा चाळी उभारणीकरिता शासनाकडून अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदा चाळ प्रकल्प उभारणी प्रकल्प २०२५-२६ मध्ये प्रति टन ४००० हजार रुपये किंवा ५० टक्के खर्च यातील जी रक्कम कमी असेल ते अनुदान दिले जाते..चाळीचे आकारमानकांदा साठवण्यासाठी दोन पाखी चाळ अधिक उपयुक्त मानली जाते. साधारणपणे चाळीची प्रत्येक पाखीची रुंदी ४ फूट ठेवावी आणि मध्यभागी ४ फूट मोकळी जागा असावी. लांबी गरजेनुसार २० ते २५ फूट ठेवता येते. चाळीची उंची मध्यभागी ८ फूट आणि बाजूंनी ६ फूट असावी. तसेच तळाशी २ फूट मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे हवा खेळती राहते..Onion Harvest: कांदा पीक आलेय काढणीवर.चाळीचे बांधकामचाळ बांधताना उंच आणि पाणी न साचणारी जागा निवडावी. दोन पाखी चाळ पूर्व-पश्चिम दिशेत उभारावी, तर एक पाखी चाळ दक्षिण-उत्तर दिशेत उभारल्यास हवा खेळती राहते. तळाशी मुरूम किंवा वाळूचा थर दिल्यास ओलावा कमी राहतो पण तरी थंडावा मिळतो.रब्बी कांदा उन्हाच्या चटक्याने लवकर खराब होतो. त्यामुळे चाळीचे छप्पर गार ठेवणे गरजेचे असते. यासाठी कांदा चाळ उंच आणि छायेदार झाडांच्यामध्ये बांधावी किंवा चाळीच्या बाजूने झाडं लावावीत. त्यांच्या सावलीत कांदा चाळीचे तापमान कमी राहिल. सिमेंट किंवा पत्र्यांचे छप्पर वापरत असल्यास त्यावर पाचट टाकल्यास तापमान नियंत्रणात राहते. छप्पर थोडे उतरते ठेवावे आणि भिंतीच्या बाहेर किमान ३ फूट पुढे असावे, जेणेकरून पावसाचे पाणी आत शिरणार नाही..साठवणुकीतल्या चुकाकांद्याचा ढिग ४ फूटांपेक्षा जास्त उंच ठेवू नये. उंची जास्त असल्यास खालच्या कांद्यावर दाब वाढतो आणि हवा नीट फिरत नाही, त्यामुळे सडण्याची शक्यता वाढते. चाळीत हवेशीरपणा राखण्यासाठी प्रत्येक पाखीत छिद्र असलेला पीव्हीसी पाइप ठेवणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे गरम हवा बाहेर पडते.तसेच कांदा चाळ ही गोठ्याच्या बाजूला नसावी. किंवा चाळीच्या जवळ जनावरं बांधू नये. जनावरांच्या शेण आणि मुत्रामुळे कांदा सडण्याची शक्यता वाढते.यासोबत कांदा चाळीजवळ कधी खते जसे युरियाचे पोते ठेवू नये. किंवा रिकाम्या चाळीतही कधी खतांची साठवण करु नये. त्यामुळे कांदा लवकर खराब होतो. असा सल्ला जाणकार शेतकऱ्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.