Solapur News : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३७९ गावातील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. .प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ५९ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. .Rain Crop Damage: पावसाने फूलशेतीसह ऊस, भातपिकाचे प्रचंड नुकसान.यामध्ये ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे ५६ हजार ९६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यामध्ये उत्तर सोलापूर २६ कोटी ०३ लाख, दक्षिण सोलापूर ११ कोटी ९९ लाख, अक्कलकोट १४ कोटी ०४ लाख, माढा १ कोटी ५९ लाख, पंढरपूर ४ कोटी ७० लाख, बार्शी ८.१८ लाख, अपर मंद्रूप १३.९९ लाख, मोहोळ १७.७३ लाख, मंगळवेढा १२.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..Crop Damage Marathwada : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत नुकसानीचा आकडा साडेचार लाख हेक्टरवर.सोयाबीन, तूर, कांद्याचे मोठे नुकसानसप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, कांदा, बाजरी व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. .तालुकानिहाय महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतिम आकडेवारी दोन ते तीन दिवसात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.