Nashik News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख ९९ हजार ८०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. ज्यामध्ये ४ लाख २७ हजार ५८० शेतकरी बाधित झाले आहे. त्यांच्या भरपाईसाठी ३२८ कोटी ६७ लाख २५ हजारांच्या अनुदानाची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला..संपूर्ण सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या मदतीने बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण केले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत दिवसरात्र यंत्रणा पंचनाम्यांच्या कामात व्यस्त होत्या..Crop Damage Survey : नाशिक जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण.अंतिम आकडेवारीनुसार, दोन लाख ९९ हजार ८०७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यात तब्बल २ लाख ३४ हजार ११६ हेक्टरवरील जिरायती पिकांची नासाडी झाली; तर बागायत ३३ हजार ५८७ व बहुवार्षिक फळपिकांचे ३२ हजार १०३ हेक्टर क्षेत्राची हानी झाली आहे..Crop Damage Survey : पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.मालेगाव व येवला तालुक्यांत सर्वाधिक नुकसान आहे. नांदगाव, निफाड, सटाणा, चांदवड, सिन्नर यासह इतर तालुक्यांत देखील नुकसान आहे. सर्वाधिक नुकसान खरीप हंगामातील जिरायती पिकांचे आहे. त्यानंतर बागायती क्षेत्राला देखील मोठा फटका आहे. नुकसान मोठे असल्याचे पंचनामे झाल्यानंतर पुढे आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.